शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

१३ गावांत दररोज अंधार

By admin | Updated: June 29, 2015 00:24 IST

तालुक्यातील सुकळी जहागीर फिडर अंतर्गत येणाऱ्या १३ गावात दररोज रात्री नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो.

नागरिक संतप्त : सुकळी जहागीर फिडरवर तांत्रिक बिघाड उमरखेड : तालुक्यातील सुकळी जहागीर फिडर अंतर्गत येणाऱ्या १३ गावात दररोज रात्री नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. तांत्रिक बिघाडामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात अंधारात रहाणे कठीण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे. वारंवार निवेदने देऊनही वीज वितरण कंपनी मात्र दुर्लक्ष करीत आहे. सुकळी जहागीर फिडर अंतर्गत नागेशवाडी, सुकळी, वरुडबिबी, अमानपूर, मरसूळ, बेलखेड, बहागाव, कुपटी, बारा आणि आमदरी या गावांमध्ये गत सहा-सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एक-दोन दिवस झाले की वीज पुरवठा खंडित होतो. त्यानंतर दुरुस्तीचे नावच घेतले जात नाही. कधी काळी दुरुस्ती केली तर तीही कंत्राटी कामगारांच्या हाताने केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिकांना अंधारात रहावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. रात्री अंधारामुळे घराबाहेर पडणेही कठीण होते. याप्रकाराने संतप्त झालेले नागरिक शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. पावसाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. यावेळी अरविंद सुरोशे, सुदर्शन सुरोशे, दिगंबर शिंदे, नागेश गोरेवाड, दिगंबर कदम, संभाजी सुरोशे, बालाजी कदम यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी या नागरिकांशी चर्चा करण्याचेही टाळले. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)पुसद तालुक्यातील धोकादायक रोहित्र अपघातास आमंत्रण पुसद : तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी लावण्यात आलेले रोहित्रच आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसात सताड उघड्या रोहित्रांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून महावितरण मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. पुसद तालुक्यात १८९ गावे आहेत. तालुक्यात जवळपास आठशेच्यावर रोहित्र बसविण्यात आले आहे. रोहित्र सुरक्षित राहून वीज पुरवठा सुरळीत व्हावा हा या मागचा उद्देश आहे. यासाठी रोहित्राला लोखंडी जाड पत्र्याची कुलूप बंद पेटी बसविण्यात येते. वीज पुरवठा खंडित झाला किंवा इतर कोणत्याही तांत्रिक कारणामुळे रोहित्रच बिघडले तर कर्मचारी कुलूप उघडून रोहित्राची दुरुस्ती करतात. परंतु सध्या स्थितीत तालुक्यातील बहुतांश रोहित्र सताड उघडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अनेक रोहित्र दाट लोकवस्तीत असून या ठिकाणी लहान मुले नेहमी खेळत असतात. खेळताना रोहित्राच्या ताराला स्पर्श झाल्यास जीवित हानी होण्याची भीती असते. शहरातील उदासीवार्ड, शंकरनगर, गजानन मंदिर परिसर, डुबेवार ले-आऊट, मुखरे चौक, नाईक चौक, नवीन पुसद परिसर, वसंतनगर परिसर, मोतीनगर, गांधीनगर यासह बसस्थानक परिसरातील रोहित्र उघडे दिसून येतात. ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. या रोहित्रांची तत्काळ देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)