शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
3
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
4
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
5
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
6
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
7
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
8
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
9
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
10
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
11
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
12
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
13
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
14
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
15
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
16
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
17
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
18
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
19
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
20
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी

भारत नेट प्रकल्पात १२०४ ग्रामपंचायती

By admin | Updated: August 1, 2016 00:47 IST

डिजीटल इंडिया योजनेच्या माध्यमातून इंटरनेटची गती वाढवून कामात पारदर्शकता आणण्यासाठी भारत नेट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

गती वाढणार : ४७ मंडळ कार्यालयात हब यवतमाळ : डिजीटल इंडिया योजनेच्या माध्यमातून इंटरनेटची गती वाढवून कामात पारदर्शकता आणण्यासाठी भारत नेट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील १२०४ ग्रामपंचायतींना जोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने कामकाज सुरू केले आहे. यासोबतच ४७ मंडळ कार्यालयात हब उभारण्यात येणार आहे. यामुळे कामाची गती १०० पटीने वाढणार आहे. भारत नेट प्रकल्पाच्या माध्यमातून १२०४ ग्रामपंचायतीला फायबर केबल अथवा वायरलेसच्या मदतीने जोडण्यात येणार आहे. यासाठी लॅटीट्यूड आणि लँगिड्यूड लोकेशन घेण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीची नेट कनेक्टिव्हिटी १०० एमबीपीएस कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे इंटरनेटची स्पिड वाढणार आहे. ई-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या माध्यमातून कामकाजाची गती वाढविण्यासाठी मंडळाच्या ठिकाणी हब उभारले जाणार आहे. जिल्ह्यात १०१ मंडळ कार्यालय आहे. यापैकी ४७ ठिकाणी बीएसएनएलची पॉवरफुल लिंक आहे. या ४७ ठिकाणी हब उभारले जाणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने वर्क स्टेशनसाठी आठ लाख रूपयांचा निधी दूरसंचार निगमकडे वळता केला आहे. हे स्टेशन कार्यान्वित होताच एका राऊटवर २० लॅपटॉप पूर्ण क्षमतेने चालविता येणार आहे. ज्याकामाला पूर्वी १० मिनिटे लागत होती अथवा लिंक फेल झाल्यामुळे अनेक दिवस लागायचे, ते काम काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागात या योजनेसाठी ओएफसीचे जाळे उभारले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ओएफसी लाईनवरुन बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे हायस्पीड इंटरनेट सेवा ग्रामीण भागात मिळेल. त्यातून ग्रामपंचायतीचा कारभार गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ही सेवा सुरळीत राहणे गरजेचे आहे. (शहर वार्ताहर)