शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

वाघाच्या बंदोबस्तासाठी १२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:27 IST

राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील तब्बल १५ जणांचे बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली आहे.

ठळक मुद्देअपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची भेट : मध्यप्रदेशातून येणार चार हत्ती

अशोक पिंपरे ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील तब्बल १५ जणांचे बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली आहे. त्यासाठी जंगलालगत विशिष्ट ठिकाणी कुंपन करण्यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वाघाला बेशुद्ध करण्याकरिता मध्यप्रदेशातून चार हत्ती व इतर कर्मचारी पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाघ प्रभावीत क्षेत्रात हत्तीवरून शोध घेऊन वाघाला चारही बाजूने घेरून बेशुद्ध केले जाणार आहे. वाघाच्या भितीने राळेगाव, कळंब, पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. मजुरांची मजुरी बंद झाली. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे वन विभागातर्फे प्रभावित क्षेत्रात उंच मचान उभारण्यात येणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेती करता यावी, यासाठी कुणी तरी मचानवर उभे राहून चारही बाजूने लक्ष ठेवणार आहे.सराटी, बोराटी, लोणी, बंदर, मोहदा, वेडशी, सावरखेडा, वरध, डोंगरखर्डा, किनवट, तेजनी, विहीरगाव या क्षेत्राला वाघ प्राभवीत क्षेत्र मानले गेले असून येथे वाघाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे जंगलात विशिष्ट भागात कुंपन उभारून गावकऱ्यांना संरक्षण देण्याकरिता १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही लिमये यांनी स्पष्ट केले. कुंपनाचे काम येत्या काही दिवसांत सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेऊन सूचना देल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य वनसंरक्षक पी.जे. राहुलकर, उपवन संरक्षक के. अर्भणा, सहाय्यक व्यवस्थापक वसंत सरपे उपस्थित होते. त्यांच्याकडे उपस्थितांनी वाघ पकडण्याची मागणी केली. जनतेतर्फे माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, अशोक केवटे, अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे, अंकुश मुनेश्वर, नीलेश रोठे, जयप्रकाश रागीनवार आदींनी बाजू मांडलीअभयारण्याचा प्रस्ताव नाहीया परिसरात वाघाला पोषक वातावरण असल्यामुळे येथे भविष्यात अभायारण्य होईल म्हणून वनविभाग वाघाला पकडत नसून येथे अभयारण्य होणार असल्याची चर्चा होती. मात्र अभयारण्याचा प्रस्तावच नसून भविष्यातही अभयारण्या होणार नाही, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.संपर्क कार्यालय राळेगावातजंगलाचा बराच भाग राळेगाव तालुक्यात येतो. मात्र वन कार्यालय मारेगाव येथे असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संपर्क होण्यास वेळ लागतो. यामुळे आता वनविभागाचे उपकार्यालय राळेगावात सुरू करण्याचे निश्चित झाले. येथे दोन अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. कार्यालयासाठी वास्तू उपलब्ध करून देण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.सोळावा बळी न जाण्याची काळजी घ्याआत्तापर्यंत वाघाने १५ बळी घेतले आहे. आता १६ वा बळी जाणार नाही एवढी शासन व वनविभागाच्या कर्मचाºयांनी काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे सावरखेडा येथील लेतूजी जुनघरे व जयप्रकाश रागीनवार यांनी लिमये यांच्याकडे केली.

टॅग्स :Tigerवाघ