शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गुटखा तस्करीतून 'या' मार्गावर कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:03 IST

महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची लगतच्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सर्रास निर्मिती केली जाते. तेथे तयार झालेला गुटखा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात आणला जातो.

ठळक मुद्देफायनान्सर रेकॉर्डवर नाहीआयकर विभागानेही लक्ष घालण्याची वेळ

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी हे गुटखा तस्करीचे प्रमुख केंद्र आहे. येथून कारंजा-अमरावती या एका मार्गावर गुटखा पाठविला जातो. त्यात वर्षाकाठी १२ कोटींची उलाढाल होते, असे इतरही मार्ग जिल्ह्यातून तस्करीसाठी वापरले जातात. यवतमाळ मुख्यालय तर यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक व्हाईट कॉलर व प्रशासकीय सेवेतील व्यक्तीही या तस्करीच्या व्यवसायात अप्रत्यक्षपणे उतरले आहे. पारवा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून आर्णीचा मेहबूब, कारंजाचा अहेमद व अमरावतीतील जावेद पुन्हा रडावर आले आहे

महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची लगतच्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सर्रास निर्मिती केली जाते. तेथे तयार झालेला गुटखा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात आणला जातो. आर्णीतील मेहबूब हा एकटाच महिन्याला एक कोटी रुपयांचा गुटखा वितरित करतो. पारवा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडलेला मुद्देमाल हा दहा लाखांचा आहे. महिन्याला किमान अशा दहा ट्रीप आर्णीत आणल्या जातात. तेथून कारंजा व पुढे अमरावतीकडे गुटखा पाठविला जातो. अशा अनेक साखळ्या या गुटखा तस्करीमध्ये आहेत.

गुटख्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून नफाही चौपट आहे. त्यामुळे यात अनेकजण पैसा गुंतवतात. आजपर्यंत असा पैसा गुंतविणारे कधी रेकॉर्डवर आले नाही. आयकर विभागाने गुटख्यातील काळा पैसा इतरत्र वापरणाऱ्यांचा शोध घेण्याची गरज आहे. हा पैसा काळा असल्याने तो पांढरा करण्यासाठी अनेक फंडे वापरले जातात.

पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुटखा तस्करीचे रॅकेट उघड केले. शेख अबरार शेख गफार, भीमराव मधुकर उईके, मो. अफताब मो. अयुब, अलताफ अफसर शेख (२०) सर्व रा, आर्णी यांना अटक केली. तर शेख गफुर, शेख मेहबूब शेख सादीक रा. शास्त्रीनगर आर्णी हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. यातील शेख मेहबूब हा या तस्करीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे विणले आहे. पारवा पोलीस सध्या शेख महेबूब याच्या मागावर असून गुटखा तस्करीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत अनेक कारवाया झाल्या. मात्र मुख्य सूत्रधारांना हात लावण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही.

तस्करीतील ईझी मनीमुळे गुन्हेगारीला चालना

गुटखा तस्करीतून येणारा ईझी मनी हा गुन्हेगारीला चालना देण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे समाजहितासाठी हे तस्करीचे जाळे मुळासकट उखडून फेकण्यासाठी सखोल कारवाईची गरज आहे. यात पोलिसांव्यतिरिक्त अन्न सुरक्षा विभाग व आयकर विभागानेही लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदी