शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बोगस आदिवासींसाठी खुल्या प्रवर्गाच्या ११७०० जागा अडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:42 IST

सध्या जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना खुल्या वर्गात गृहित धरण्याचा आदेश काढून शासनाने खुल्या प्रवर्गाची तब्बल ११,७०० पदे अडवून धरली आहेत. बिरसा क्रांतिदलाने थेट मंत्रिमंडळ उपसमितीच्या नेमणुकीवरच आक्षेप नोंदविला आहे.

ठळक मुद्देबिरसा क्रांतिदलाचा आक्षेपमंत्रिमंडळ उपसमिती म्हणजे वेळकाढूपणा, न्यायालयाचा अवमान

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आदिवासींना सेवेतून कमी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरही राज्य शासनाने तब्बल ११ महिन्यांचा काळ धकवून नेला. आता याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमून आणखी वेळ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गंभीर म्हणजे, सध्या जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना खुल्या वर्गात गृहित धरण्याचा आदेश काढून शासनाने खुल्या प्रवर्गाची तब्बल ११,७०० पदे अडवून धरली आहेत. शासनाच्या या वेळकाढूपणाचा निषेध करीत बिरसा क्रांतिदलाने थेट मंत्रिमंडळ उपसमितीच्या नेमणुकीवरच आक्षेप नोंदविला आहे.सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी खऱ्या आदिवासींच्या घटनात्मक तरतुदींचे संरक्षण करणारा निर्णय दिला होता. राखीव प्रवर्गात लागलेल्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे नोकरीतील सर्व लाभ सुरवातीपासूनच अवैध ठरतात. त्यामुळे कोणतेही राज्य शासन परिपत्रक काढून अशा कर्मचाऱ्यांच्या नोकरीला संरक्षण देऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला पुढच्या महिन्यात एक वर्ष होत आले तरी शासनाने बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचेच प्रयत्न चालविले आहे, असा आरोप बिरसा क्रांतिदलाने केला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने बिरसा क्रांतिदलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी व राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम यांनी २३ मार्चरोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. असे असतानाही राज्य शासनाने बोगस आदिवासींना संरक्षण देण्यासाठी ५ जून रोजी मंत्री गटाची उपसमिती नेमली आहे. आक्षेपार्ह म्हणजे, या उपसमितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला जात प्रमाणपत्र अवैध ठरले म्हणून सेवेतून कमी करण्यात येऊ नये, असे राज्य शासनाने म्हटले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करावी, सेवामुक्त होईपर्यंत या बनावट जात प्रमाणपत्र धारकांना खुल्या प्रवर्गात समजण्यात यावे, ज्या राखीव जागांवर त्यांना नियुक्ती मिळाली त्या जागा रिक्त समजण्यात याव्या, अशा गंभीर बाबी या आदेशात नमूद करण्यात आल्या.एकीकडे राज्य शासनाच्या नोकरीत ११,७०० बोगस आदिवासी असल्याची आकडेवारी शासनानेच पुढे आणली आहे. तर आता या कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गातील कर्मचारी गृहित धरण्याचे आदेश दिले. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील ११,७०० जागा प्रभावित झाल्या आहे. किमान पुढील वर्षभर तरी खुल्या प्रवर्गातील हजारो जागा भरताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.निवडणुकांसाठी टाळाटाळ२०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राज्य शासनाने मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करून बोगस आदिवासींना संरक्षण दिले आहे, असा आरोप बिरसा क्रांतिदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी केला. उपसमिती नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी विसंगत आहे. आदिवासींबाबत कोणताही निर्णय घेताना पहिल्यांदा अनुसूचित जनजाती सल्लागार समितीत चर्चा होणे आवश्यक आहे. पण शासनाने तसे केलेले नाही. २६ आदिवासी आमदार या निर्णयाबाबत गप्प असल्याने आदिवासी समाज संतापला आहे. उपसमिती नेमण्याच्या निर्णयाविरोधात संघटना न्यायालयात जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकार