शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण

By admin | Updated: September 1, 2014 23:54 IST

लांबलेला पावसाळा, तापणारे वातावरण आणि अधामधात कोसळणारा पाऊस अशा विषम वातावरणात जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकवर काढले आहे. गत तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण आढळून आले असून

जिल्ह्यात प्रकोप : शासकीय यंत्रणा गाफीलचसुरेंद्र राऊत -यवतमाळ लांबलेला पावसाळा, तापणारे वातावरण आणि अधामधात कोसळणारा पाऊस अशा विषम वातावरणात जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकवर काढले आहे. गत तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण आढळून आले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या आणि मृतांची कुठलीही नोंद शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. किटकजन्य आजाराचा प्रकोप होत असतानाही आरोग्य यंत्रणेकडून मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. डेंग्यूच्या तापावर थेट उपचार नसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एकट्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात ११५ रुग्णांना डेंग्यू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. जून महिन्यात सात रुग्ण तपासणीस आले होते. जुलैमध्ये हीच संख्या ४३ वर गेली. तर आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे ६५ रुग्ण दाखल झाले. हा केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांचा आकडा आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. त्यामुळे अधिकृत आकडेवारी उपलब्ध होत नाही. यावर्षी सर्वाधिक तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ असतानाही आरोग्य यंत्रणेकडून मात्र विशेष असे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. शासकीय रुग्णालयामध्ये तीन महिन्यात दोन रुग्णांना डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या प्रकोपापासून आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)