शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने ११४० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:45 IST

जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण पूर्ण : पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.जिल्ह्यात यावर्षी चार लाख ७० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. यापैकी दोन लाख ४० हजार हेक्टरक्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात होता. यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात १० दिवसांत बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण सुरू केले होते. आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कृषी विभागाने अंतिम अहवाल तयार केला आहे.कृषी विभागाच्या अंतिम अहवालात जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने अहवालात वर्तविला आहे. यात सुमारे तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकुसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे.बोंडअळीमुळे यावर्षी जिल्ह्यात ेकपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट आली आहे. दरवर्षी जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ३० ते ३५ लाख क्विंटल कापसाची खरेदी होते. यावर्षी केवळ २० लाख क्ंिवटलची खरेदी झाली. यातूनही शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.ंशेतकऱ्यांना पुढील वर्षीची चिंताजिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीची सर्वाधिक लागवड होते. कापूस लागवडीत शेतकºयांचा हातखंडा आहे. मात्र बोंडअळीच्या नुकसानीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी पुढील वर्षी नेमके काय पेरायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.अनेक शेतकरी मदतीपासून वंचितचा धोकाशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी शेतातून उपटली. मात्र नंतरच्या सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षकांनी ही जागा निरंक दाखविली. सर्वेक्षणाच्या अंतिम यादी प्रकाशनातून हे वास्तव पुढे आले. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे.