शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने ११४० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:45 IST

जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण पूर्ण : पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.जिल्ह्यात यावर्षी चार लाख ७० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. यापैकी दोन लाख ४० हजार हेक्टरक्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात होता. यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात १० दिवसांत बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण सुरू केले होते. आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कृषी विभागाने अंतिम अहवाल तयार केला आहे.कृषी विभागाच्या अंतिम अहवालात जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने अहवालात वर्तविला आहे. यात सुमारे तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकुसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे.बोंडअळीमुळे यावर्षी जिल्ह्यात ेकपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट आली आहे. दरवर्षी जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ३० ते ३५ लाख क्विंटल कापसाची खरेदी होते. यावर्षी केवळ २० लाख क्ंिवटलची खरेदी झाली. यातूनही शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.ंशेतकऱ्यांना पुढील वर्षीची चिंताजिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीची सर्वाधिक लागवड होते. कापूस लागवडीत शेतकºयांचा हातखंडा आहे. मात्र बोंडअळीच्या नुकसानीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी पुढील वर्षी नेमके काय पेरायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.अनेक शेतकरी मदतीपासून वंचितचा धोकाशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी शेतातून उपटली. मात्र नंतरच्या सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षकांनी ही जागा निरंक दाखविली. सर्वेक्षणाच्या अंतिम यादी प्रकाशनातून हे वास्तव पुढे आले. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे.