शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोंडअळीने ११४० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:45 IST

जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण पूर्ण : पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.जिल्ह्यात यावर्षी चार लाख ७० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. यापैकी दोन लाख ४० हजार हेक्टरक्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात होता. यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात १० दिवसांत बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण सुरू केले होते. आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कृषी विभागाने अंतिम अहवाल तयार केला आहे.कृषी विभागाच्या अंतिम अहवालात जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने अहवालात वर्तविला आहे. यात सुमारे तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकुसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे.बोंडअळीमुळे यावर्षी जिल्ह्यात ेकपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट आली आहे. दरवर्षी जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ३० ते ३५ लाख क्विंटल कापसाची खरेदी होते. यावर्षी केवळ २० लाख क्ंिवटलची खरेदी झाली. यातूनही शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.ंशेतकऱ्यांना पुढील वर्षीची चिंताजिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीची सर्वाधिक लागवड होते. कापूस लागवडीत शेतकºयांचा हातखंडा आहे. मात्र बोंडअळीच्या नुकसानीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी पुढील वर्षी नेमके काय पेरायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.अनेक शेतकरी मदतीपासून वंचितचा धोकाशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी शेतातून उपटली. मात्र नंतरच्या सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षकांनी ही जागा निरंक दाखविली. सर्वेक्षणाच्या अंतिम यादी प्रकाशनातून हे वास्तव पुढे आले. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे.