शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचाराचे ११०५ गुन्हे

By admin | Updated: December 24, 2015 02:59 IST

विवाहित महिला व मुलींवरील अत्याचाराचे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार १०५ गुन्हे दाखल झाले आहेत.

१४ अपहृत बेपत्ताच : २१ खून, ९२ बलात्कार, ४३३ विनयभंग, १०५ अपहरण सुरेंद्र राऊत यवतमाळ विवाहित महिला व मुलींवरील अत्याचाराचे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात विनयभंगाच्या सर्वाधिक ४३३ गुन्ह्यांचा समावेश आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे हे गुन्हे दाखल झाले आहेत. तब्बल २१ महिलांचे खून तर २५ महिलांच्या खुनाचा प्रयत्न केला गेला आहे. २३ महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. माहेरहून पैसे आणू न शकलेल्या १६ महिला हुंडाबळी ठरल्या आहेत. सासरच्यांकडून त्यांचा बळी गेला आहे. पती व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचे २३७ गुन्हे नोंदविले गेले. ४३३ महिला-मुलींच्या विनयभंगाची नोंद पोलीस दप्तरी घेतली गेली. ९२ महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहे. जिल्ह्यातून १०५ महिला व मुलींचे अपहरण झाले असून त्यातील १४ महिलांचा अद्यापही पोलिसांना शोध लावता आलेला नाही. त्यांचे अपहरण झाले मात्र कुणी केले व कशासाठी केले, आज नेमक्या त्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागलेला नाही. महिलांना अश्लील शिवीगाळ व हावभाव करण्याचे १५३ गुन्हे नोंदविले गेले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५ मध्ये ४०४ ने घटल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, छळ, विनयभंग, बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येते. विवाहितांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी या गुन्ह्यांच्या प्रकारात अनुक्रमे ५ व ८ ने वाढ झाली आहे. दाखल गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ९९ टक्के असल्याचा पोलिसांचा दावा आहे. महिला तक्रार निवारण कक्षाला यशसासरच्यांकडून होणाऱ्या छळाची तक्रार घेऊन विवाहिता पोलीस ठाण्यात गेल्यानंतर थेट गुन्हा नोंदविला जात नाही. या विवाहितेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविले जाते. तेथे संसार तुटू नये, गैरसमज दूर व्हावे म्हणून समूपदेशन केले जाते. पती, पत्नी व तिच्या नातेवाईकांची समजूत घातली जाते. या माध्यमातून या केंद्राने अनेक तुटणारे संसार वाचविले आहे. आजही हे संसार सुखा-समाधानाने सुरू आहेत. गेल्या वर्षभरात अशा ५० महिलांचे यशस्वीपणे समूपदेशन केल्याने सन २०१५ मध्ये तेवढे गुन्हे २०१४ च्या तुलनेत कमी नोंदविले गेले आहेत. दोनही बाजूच्या मंडळींना बोलावून कौटुंबिक वातावरणात समूपदेशनाचा महिला तक्रार निवारण केंद्राचा हा प्रयत्न यशस्वी होतो आहे. काही प्रकरणात मात्र पती-पत्नीचे नव्हे तर दोनही बाजूची मंडळी टोकाची भूमिका घेत असल्याने नाईलाजाने छळाचे गुन्हे नोंदविले जातात.