शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महिला अत्याचाराचे ११०५ गुन्हे

By admin | Updated: December 24, 2015 02:59 IST

विवाहित महिला व मुलींवरील अत्याचाराचे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार १०५ गुन्हे दाखल झाले आहेत.

१४ अपहृत बेपत्ताच : २१ खून, ९२ बलात्कार, ४३३ विनयभंग, १०५ अपहरण सुरेंद्र राऊत यवतमाळ विवाहित महिला व मुलींवरील अत्याचाराचे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात विनयभंगाच्या सर्वाधिक ४३३ गुन्ह्यांचा समावेश आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे हे गुन्हे दाखल झाले आहेत. तब्बल २१ महिलांचे खून तर २५ महिलांच्या खुनाचा प्रयत्न केला गेला आहे. २३ महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. माहेरहून पैसे आणू न शकलेल्या १६ महिला हुंडाबळी ठरल्या आहेत. सासरच्यांकडून त्यांचा बळी गेला आहे. पती व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचे २३७ गुन्हे नोंदविले गेले. ४३३ महिला-मुलींच्या विनयभंगाची नोंद पोलीस दप्तरी घेतली गेली. ९२ महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहे. जिल्ह्यातून १०५ महिला व मुलींचे अपहरण झाले असून त्यातील १४ महिलांचा अद्यापही पोलिसांना शोध लावता आलेला नाही. त्यांचे अपहरण झाले मात्र कुणी केले व कशासाठी केले, आज नेमक्या त्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागलेला नाही. महिलांना अश्लील शिवीगाळ व हावभाव करण्याचे १५३ गुन्हे नोंदविले गेले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५ मध्ये ४०४ ने घटल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, छळ, विनयभंग, बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येते. विवाहितांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी या गुन्ह्यांच्या प्रकारात अनुक्रमे ५ व ८ ने वाढ झाली आहे. दाखल गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ९९ टक्के असल्याचा पोलिसांचा दावा आहे. महिला तक्रार निवारण कक्षाला यशसासरच्यांकडून होणाऱ्या छळाची तक्रार घेऊन विवाहिता पोलीस ठाण्यात गेल्यानंतर थेट गुन्हा नोंदविला जात नाही. या विवाहितेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविले जाते. तेथे संसार तुटू नये, गैरसमज दूर व्हावे म्हणून समूपदेशन केले जाते. पती, पत्नी व तिच्या नातेवाईकांची समजूत घातली जाते. या माध्यमातून या केंद्राने अनेक तुटणारे संसार वाचविले आहे. आजही हे संसार सुखा-समाधानाने सुरू आहेत. गेल्या वर्षभरात अशा ५० महिलांचे यशस्वीपणे समूपदेशन केल्याने सन २०१५ मध्ये तेवढे गुन्हे २०१४ च्या तुलनेत कमी नोंदविले गेले आहेत. दोनही बाजूच्या मंडळींना बोलावून कौटुंबिक वातावरणात समूपदेशनाचा महिला तक्रार निवारण केंद्राचा हा प्रयत्न यशस्वी होतो आहे. काही प्रकरणात मात्र पती-पत्नीचे नव्हे तर दोनही बाजूची मंडळी टोकाची भूमिका घेत असल्याने नाईलाजाने छळाचे गुन्हे नोंदविले जातात.