शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

११ हजार कृषिपंपांच्या जोडण्या खोळंबल्या

By admin | Updated: October 7, 2015 02:54 IST

मुख्यमंत्र्यांसह ऊर्जामंत्र्यांनी जिल्ह्यातील वीज जोडणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यवतमाळ : मुख्यमंत्र्यांसह ऊर्जामंत्र्यांनी जिल्ह्यातील वीज जोडणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या विभागातील कर्मचाऱ्यांनी तसे आश्वासन मंत्री महोदयांना दिले होते. परंतु, हा कालावधी संपल्यानंतरही वीज वितरण कंपनीला कृषिपंपांची वीज जोडणी करता आली नाही. आजही ११ हजार कृषिपंपांच्या वीज जोडण्या वेटिंग आहेत. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सिंचनाची संपूर्ण मदार कृषिपंपांच्या सिंचनावरच अवलंबून आहे. ८५ हजार कृषिपंप कार्यन्वित आहेत. यासोबतच ११ हजार ५०६ शेतकऱ्यांनी कृषिपंपांसाठी वीज वितरण कंपनीकडे कोटेशन भरले आहे. वीज जोडणीची मागणी केली आहे. यामधील अनेक अर्ज गत तीन वर्षांपासून खोळंबले आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांसह शेतकरी परिवारातील कुटुंबांनी वीज कंपनीच्या शेकडो पायऱ्या झिजविल्या. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. यातून शेतकऱ्यांनी आशाच सोडली आहे. यामुळे विहिरीची व्यवस्था असली तरी शेतकऱ्यांना सिंचन करताच आले नाही. यामुळे दुष्काळी स्थितीच्या संकटावरही शेतकऱ्यांना मात करता आली नाही. यातून शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका सहन करावा लागला.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्राथमिकता दिली आहे. या जिल्ह्यासाठी जातीने लक्ष देता यावे म्हणून स्वत: आढावा बैठक घेतली. अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांनीही होकार दिला. या संपूर्ण प्रक्रियेचा जिल्हा प्रशासन पाठपुरावा करीत आहे. मात्र, कामाची गती वाढली नाही. यातून गत पाच महिन्यांत केवळ १७५० वीज जोडण्या करण्यात आल्या. अद्यापही ११ हजार ५०६ वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे वीज कंपनीने स्पष्ट केले आहे. यासोबतच कृषिपंप आणि गाव फिडरवर विजेचे असंख्य प्रश्न कायम आहेत. नवीन डीपी, ट्रान्सफार्मर, फ्यूज आणि इतर प्रश्न आजही कायम आहे. विजेचे पोल, अतिरिक्त वीज केंद्रांची आवश्यकता आहे. वीज पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहे. यासोबतच वीज जोडण्याही क रण्यात येत आहे. इन्फ्रा १, इन्फ्रा २ आणि विदर्भ पॅकेजमधून जिल्ह्यातील कृषिपंपाच्या वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन वीज वितरण कंपनीने तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासोबत विविध अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे ११ हजार ५०६ कृषिपंपांच्या वीज जोडण्या पूर्णत्वास जाण्यास विलंब लागणार आहे. (शहर वार्ताहर)