शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:44 IST

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

ठळक मुद्देबदली विषयक धोरण जाहीर १५ टक्क्यांची मर्यादामात्र निर्णय एकतर्फी घेतल्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.नव्या बदली विषयक धोरणात प्रशासकीय विनंती बदल्यांची टक्केवारी १५ एवढी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली. सध्या वेगवेगळ्या संवर्गातील जी पदे रिक्त आहेत ती पुढेही रिक्त ठेवण्याचे धोरण ठरविले गेले आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व समकक्ष रिक्त पदांबाबतचा निर्णय मुंबई मुख्यालयात घेतला जाईल. इतर अतिरिक्त कार्यकारी अभियंते, समकक्ष व त्याखालील पदांचा निर्णय मुख्य कार्यालय घेणार नाही. तर प्रदेशांतर्गत पदांचा निर्णय क्षेत्रीय संचालक घेणार आहेत.

सध्या अभियंत्यांची एक हजार दोन पदे रिक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असून ती भरली जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले गेले. त्यामध्ये मुख्य अभियंता दोन, अधीक्षक अभियंता नऊ, कार्यकारी अभियंता २५, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ७४, उपकार्यकारी अभियंता १००, सहायक अभियंता ३२९ व कनिष्ठ अभियंत्यांच्या ४६३ पदांंचा समावेश आहे. ही पदे पुढेही रिक्त ठेवली जाणार असल्याने उपलब्ध अभियंत्यांवर कामांचा ताण वाढणार असून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. १८ ऑगस्ट २०२० ला निर्माण करण्यात आलेली ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वित्त व मानव संसाधन या संवर्गातील रिक्त पदे न भरण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.

कर्मचारी कमी करण्याचा घाटमनुष्यबळ संरचनेसाठी काही वर्षापूर्वी समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेली संरचना स्वीकारून अमलात आणली गेली. आता मात्र त्यामध्ये एकतर्फी बदल करून कर्मचारी कमी करण्याचा घाट घातला गेल्याचा सूर उमटत आहे.

फ्रॅन्चायझी क्षेत्रातील यंत्रणेचाही विचारशिळ, मुंब्रा, कळवा, मालेगाव हे क्षेत्र फ्रॅन्चायझीला हस्तांतरित केल्याने तेथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे योग्य समायोजन करण्याचे नव्या बदली विषयक धोरणात ठरविण्यात आले. नागपूर शहर मंडळात फ्रॅन्चायझी सुरू झाली तेव्हा या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविले गेले त्यांच्याबाबत विचार करण्याचे ठरले. सर्व बदल्या आता मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.बदली धोरण ठरविताना कोणत्याही संघटनेला विश्वासात घेतले गेले नाहीत, असे सांगत काहींनी या बदली धोरणाला छुपा विरोध दर्शविला आहे.

यंदाचे बदली धोरण ठरविताना संघटनांना विश्वासात घेतले गेले नसले तरी त्यात पारदर्शकता दिसून येते. विविध संवर्गाची २५ हजार पदे महावितरणमध्ये रिक्त आहेत. यंदा बदल्या करताना त्यात आणखी वाढ होऊ नये, फिल्डवरची पदे तातडीने भरली जावी, त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणी येणार नाही.- कृष्णा भोयर, सरचिटणीस एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.

टॅग्स :mahavitaranमहावितरण