शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:44 IST

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

ठळक मुद्देबदली विषयक धोरण जाहीर १५ टक्क्यांची मर्यादामात्र निर्णय एकतर्फी घेतल्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.नव्या बदली विषयक धोरणात प्रशासकीय विनंती बदल्यांची टक्केवारी १५ एवढी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली. सध्या वेगवेगळ्या संवर्गातील जी पदे रिक्त आहेत ती पुढेही रिक्त ठेवण्याचे धोरण ठरविले गेले आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व समकक्ष रिक्त पदांबाबतचा निर्णय मुंबई मुख्यालयात घेतला जाईल. इतर अतिरिक्त कार्यकारी अभियंते, समकक्ष व त्याखालील पदांचा निर्णय मुख्य कार्यालय घेणार नाही. तर प्रदेशांतर्गत पदांचा निर्णय क्षेत्रीय संचालक घेणार आहेत.

सध्या अभियंत्यांची एक हजार दोन पदे रिक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असून ती भरली जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले गेले. त्यामध्ये मुख्य अभियंता दोन, अधीक्षक अभियंता नऊ, कार्यकारी अभियंता २५, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ७४, उपकार्यकारी अभियंता १००, सहायक अभियंता ३२९ व कनिष्ठ अभियंत्यांच्या ४६३ पदांंचा समावेश आहे. ही पदे पुढेही रिक्त ठेवली जाणार असल्याने उपलब्ध अभियंत्यांवर कामांचा ताण वाढणार असून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. १८ ऑगस्ट २०२० ला निर्माण करण्यात आलेली ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वित्त व मानव संसाधन या संवर्गातील रिक्त पदे न भरण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.

कर्मचारी कमी करण्याचा घाटमनुष्यबळ संरचनेसाठी काही वर्षापूर्वी समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेली संरचना स्वीकारून अमलात आणली गेली. आता मात्र त्यामध्ये एकतर्फी बदल करून कर्मचारी कमी करण्याचा घाट घातला गेल्याचा सूर उमटत आहे.

फ्रॅन्चायझी क्षेत्रातील यंत्रणेचाही विचारशिळ, मुंब्रा, कळवा, मालेगाव हे क्षेत्र फ्रॅन्चायझीला हस्तांतरित केल्याने तेथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे योग्य समायोजन करण्याचे नव्या बदली विषयक धोरणात ठरविण्यात आले. नागपूर शहर मंडळात फ्रॅन्चायझी सुरू झाली तेव्हा या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविले गेले त्यांच्याबाबत विचार करण्याचे ठरले. सर्व बदल्या आता मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.बदली धोरण ठरविताना कोणत्याही संघटनेला विश्वासात घेतले गेले नाहीत, असे सांगत काहींनी या बदली धोरणाला छुपा विरोध दर्शविला आहे.

यंदाचे बदली धोरण ठरविताना संघटनांना विश्वासात घेतले गेले नसले तरी त्यात पारदर्शकता दिसून येते. विविध संवर्गाची २५ हजार पदे महावितरणमध्ये रिक्त आहेत. यंदा बदल्या करताना त्यात आणखी वाढ होऊ नये, फिल्डवरची पदे तातडीने भरली जावी, त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणी येणार नाही.- कृष्णा भोयर, सरचिटणीस एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.

टॅग्स :mahavitaranमहावितरण