शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:44 IST

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

ठळक मुद्देबदली विषयक धोरण जाहीर १५ टक्क्यांची मर्यादामात्र निर्णय एकतर्फी घेतल्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.नव्या बदली विषयक धोरणात प्रशासकीय विनंती बदल्यांची टक्केवारी १५ एवढी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली. सध्या वेगवेगळ्या संवर्गातील जी पदे रिक्त आहेत ती पुढेही रिक्त ठेवण्याचे धोरण ठरविले गेले आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व समकक्ष रिक्त पदांबाबतचा निर्णय मुंबई मुख्यालयात घेतला जाईल. इतर अतिरिक्त कार्यकारी अभियंते, समकक्ष व त्याखालील पदांचा निर्णय मुख्य कार्यालय घेणार नाही. तर प्रदेशांतर्गत पदांचा निर्णय क्षेत्रीय संचालक घेणार आहेत.

सध्या अभियंत्यांची एक हजार दोन पदे रिक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असून ती भरली जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले गेले. त्यामध्ये मुख्य अभियंता दोन, अधीक्षक अभियंता नऊ, कार्यकारी अभियंता २५, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ७४, उपकार्यकारी अभियंता १००, सहायक अभियंता ३२९ व कनिष्ठ अभियंत्यांच्या ४६३ पदांंचा समावेश आहे. ही पदे पुढेही रिक्त ठेवली जाणार असल्याने उपलब्ध अभियंत्यांवर कामांचा ताण वाढणार असून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. १८ ऑगस्ट २०२० ला निर्माण करण्यात आलेली ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वित्त व मानव संसाधन या संवर्गातील रिक्त पदे न भरण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.

कर्मचारी कमी करण्याचा घाटमनुष्यबळ संरचनेसाठी काही वर्षापूर्वी समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेली संरचना स्वीकारून अमलात आणली गेली. आता मात्र त्यामध्ये एकतर्फी बदल करून कर्मचारी कमी करण्याचा घाट घातला गेल्याचा सूर उमटत आहे.

फ्रॅन्चायझी क्षेत्रातील यंत्रणेचाही विचारशिळ, मुंब्रा, कळवा, मालेगाव हे क्षेत्र फ्रॅन्चायझीला हस्तांतरित केल्याने तेथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे योग्य समायोजन करण्याचे नव्या बदली विषयक धोरणात ठरविण्यात आले. नागपूर शहर मंडळात फ्रॅन्चायझी सुरू झाली तेव्हा या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविले गेले त्यांच्याबाबत विचार करण्याचे ठरले. सर्व बदल्या आता मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.बदली धोरण ठरविताना कोणत्याही संघटनेला विश्वासात घेतले गेले नाहीत, असे सांगत काहींनी या बदली धोरणाला छुपा विरोध दर्शविला आहे.

यंदाचे बदली धोरण ठरविताना संघटनांना विश्वासात घेतले गेले नसले तरी त्यात पारदर्शकता दिसून येते. विविध संवर्गाची २५ हजार पदे महावितरणमध्ये रिक्त आहेत. यंदा बदल्या करताना त्यात आणखी वाढ होऊ नये, फिल्डवरची पदे तातडीने भरली जावी, त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणी येणार नाही.- कृष्णा भोयर, सरचिटणीस एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.

टॅग्स :mahavitaranमहावितरण