शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

राज्यातल्या १५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या १० जणांची बाजी

By अविनाश साबापुरे | Updated: September 18, 2023 20:13 IST

व्यावसायिक प्रशिक्षणात कामगिरी : यवतमाळ आयटीआयचा राज्यात झेंडा

यवतमाळ : एकेकाळी दुर्लक्षित असलेले आयटीआयमधील विविध अभ्यासक्रम आता विद्यार्थीप्रिय होत आहेत. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रँक निश्चित करणारी परीक्षा नुकतीच पार पडली. त्यात महाराष्ट्रातून निवडलेल्या १५ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या तब्बल १० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशात यवतमाळची मान उंचावली आहे.

विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी यवतमाळच्या शासकीय आयटीआयचे विद्यार्थी आहेत. शासनामार्फत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. यात राज्यातील सर्वच आयटीआयमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून महाराष्ट्रातील अव्वल १५ विद्यार्थी नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. या १५ पैकी १० जण यवतमाळचे आहेत, हे विशेष. यामध्ये स्नेहल राठोड, अनुराग मनवर, मनिषा मेश्राम या तिघांनी ६०० पैकी ५९९ गुण घेत पहिली रँक मिळविली. अंकिता आंबटवार, ऋतुजा आरेकर यांनी ५९८ गुणांसह दुसरी रँक मिळविली. तर गायत्री चौधरी, रोहीत खामनकर, कुणाल गवळी, पूजा कपाट, विशाल पोपळघट या विद्यार्थ्यांनी ५९७ गुणांसह तिसरी रँक पटकावली आहे. 

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदवी व ट्रॉफी देऊन १७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यवतमाळ शासकीय आयटीआयचे प्राचार्य विनोद नागोरे, व्यवसाय निदेशक देऊळकर, संजय पोटे, एफ. डी. राठोड, अनिल अनंतवार आदी मार्गदर्शकांचे परिश्रम यानिमित्ताने सत्कारणी लागले आहेत.