शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातल्या १५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या १० जणांची बाजी

By अविनाश साबापुरे | Updated: September 18, 2023 20:13 IST

व्यावसायिक प्रशिक्षणात कामगिरी : यवतमाळ आयटीआयचा राज्यात झेंडा

यवतमाळ : एकेकाळी दुर्लक्षित असलेले आयटीआयमधील विविध अभ्यासक्रम आता विद्यार्थीप्रिय होत आहेत. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रँक निश्चित करणारी परीक्षा नुकतीच पार पडली. त्यात महाराष्ट्रातून निवडलेल्या १५ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या तब्बल १० विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशात यवतमाळची मान उंचावली आहे.

विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी यवतमाळच्या शासकीय आयटीआयचे विद्यार्थी आहेत. शासनामार्फत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. यात राज्यातील सर्वच आयटीआयमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून महाराष्ट्रातील अव्वल १५ विद्यार्थी नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. या १५ पैकी १० जण यवतमाळचे आहेत, हे विशेष. यामध्ये स्नेहल राठोड, अनुराग मनवर, मनिषा मेश्राम या तिघांनी ६०० पैकी ५९९ गुण घेत पहिली रँक मिळविली. अंकिता आंबटवार, ऋतुजा आरेकर यांनी ५९८ गुणांसह दुसरी रँक मिळविली. तर गायत्री चौधरी, रोहीत खामनकर, कुणाल गवळी, पूजा कपाट, विशाल पोपळघट या विद्यार्थ्यांनी ५९७ गुणांसह तिसरी रँक पटकावली आहे. 

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदवी व ट्रॉफी देऊन १७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यवतमाळ शासकीय आयटीआयचे प्राचार्य विनोद नागोरे, व्यवसाय निदेशक देऊळकर, संजय पोटे, एफ. डी. राठोड, अनिल अनंतवार आदी मार्गदर्शकांचे परिश्रम यानिमित्ताने सत्कारणी लागले आहेत.