शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अरुणावती, बेंबळातून दहा कोटी मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:55 IST

जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते.

ठळक मुद्देप्रतीक्षा संपणार : लवकरच निविदा प्रक्रिया, मासेमारी व्यवसायाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते. अखेर सहा वर्षाने या केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्प आणि बाभूळगावच्या बेंबळा प्रकल्पावर प्रत्येकी पाच कोटी मत्स्यबीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी मत्स्य संस्थाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.मत्स्यबीज निर्मिती केंद्र त्वरित कार्यान्वित व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाठपुरावा केला. अनेक वर्षांपासून रखडलेले महत्वपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना मत्स्यपालन हा पूरक व्यवसाय करता येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ््यांची निर्मिती झाली आहे. या शेततळ्यामध्ये हंगामी स्वरूपाचे का होईना, मत्स्यपालन सहज शक्य आहे. हीच बाब हेरून जिल्हाधिकाºयांनी थेट मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला. याला मान्यता मिळाली असून, अरुणावती व बेंबळा येथील कें द्रात मत्स्यबीज निर्मिती केली जाणार आहे. याकरिता मत्स्य विभागाने दोन्ही केंद्राचे प्रत्येकी एक वर्षांसाठी १७ ते १८ लाख रुपये भाडे निश्चित केले आहे. या दोन्ही केंद्रात दहा कोटी मत्स्यजिरे संगोपन करता येणार आहे. स्थानिक पातळीवरच मत्स्यबीज मिळाल्याने मासेपालन व्यवसायाला खºया अर्थाने चालना मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीने अरुणावती केंद्रासाठी तीन कोटी तर, बेंबळा येथील मत्स्यबीज केंद्रासाठी सात कोटींचा निधी दिला होता. २०१७ मध्ये दोन्ही केंद्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण करून मत्स्य विभागाकडे हस्तांतरित केले.जिल्ह्यात पाच मत्स्यबीज केंद्रयवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी उर्ध्वपैनगंगा प्रकल्पावर इसापूर येथील मत्स्यबीज केंद्रात पाच कोटी मत्स्यबीज निर्मिती होते. त्याखालोखाल पूस आणि केळापूर तालुक्यातील सायखेडा केंद्रावर मत्स्यबीज निर्मिती केली जात होती. आता अरुणावती व बेंबळा मत्सबीज केंद्रावर निर्मिती होणार आहे. येथून मत्स्यजिरे, मत्स्यबीज, अर्धबोटूकली व बोटूकलीची विक्री केली जाईल. यात स्थानिकांना खरेदीसाठा प्राधान्य राहणार आहे.मोठ्या क्षमतेची मत्स्यबीज निर्मिती केंद्र सुरू झाल्याने शेतकºयांना शेततळ््यांचा मासेपालनासाठी वापर करता येईल. शिवाय स्थानिक मासेमारी संस्थांनाही रोजगार मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय उपलब्ध झाला आहे. शेततळे व मत्स्यपालन या दोन्ही योजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणArunavati Damअरुणावती धरण