शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

गाडी, घर, बँक बॅलन्स असूनही १० लाख लोक घरकुलासाठी रांगेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:39 IST

Yawatmal News स्वत:चे घर, गाडी, बँक बॅलन्स असतानाही बेघर असल्याचे दाखवून घरकूल लाटण्याचा प्रयत्न करणारे तब्बल १० लाख ८४ हजार ५७५ ‘गरीब’ संगणकीय यंत्रणेने शोधून बाद केले.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेत ‘पेसा’ ग्रामसभांना डावलले

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : खेड्यातल्या बेघर माणसाला निवारा मिळावा म्हणून प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. मात्र, यातही धनिकांनी आपला डाव साधण्याचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आली आहे. स्वत:चे घर, गाडी, बँक बॅलन्स असतानाही बेघर असल्याचे दाखवून घरकूल लाटण्याचा प्रयत्न करणारे तब्बल १० लाख ८४ हजार ५७५ ‘गरीब’ संगणकीय यंत्रणेने शोधून बाद केले.

ही केंद्र पुरस्कृत योजना महाराष्ट्रात २०१६-१७ पासून राबविली जात आहे. ग्रामसेवकांच्या माध्यमातून घरकूल लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातात. त्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘एनआयसी’ प्रणालीवर अपलोड होतात. परंतु, १३ जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रातील गावांमध्ये बंधनकारक असतानाही ग्रामसभांना विचारात घेतले गेले नाही. त्यांचा अधिकार डावलून ‘डीआरडीए’नेच दोन वर्षांपूर्वी याद्या तयार करुन अपलोड केल्या. यात अनेक धनिक मंडळींची नावे आली. एनआयसी प्रणालीवर नोंद झालेल्या ५७ लाख ६० हजार ५६ दावेदारांची जेव्हा पडताळणी करण्यात आली, तेव्हा गंभीर बाबी पुढे आल्या. तब्बल १० लाख ८४ हजार ५७५ दावेदारांकडे दुचाकी, चार चाकी वाहन, मालमत्ता, बँक ठेवी, प्लाॅट, फ्लॅट, पूर्वीचे पक्के घर, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती दर्शक फोटो एनआयसी प्रणालीवर अपलोड केल्यानंतर यंत्रणेने हे १९ टक्के दावे अपात्र ठरविले.

अनुसूचित क्षेत्रात योजनांचे लाभार्थी निवडण्याचे काम पेसा कायद्यानुसार ग्रामसभेचे आहे. परंतु पेसा कायदा डावलून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी लाभार्थी निवडत आहे.

- एकनाथ भोये, राज्य सचिव, ट्रायबल फोरम

टॅग्स :Governmentसरकार