शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुक; सायंकाळी ४ पर्यंतच करता येणार जाहीर प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:11 IST

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections; निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्या प्रचार करता येणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान होत असून, जिल्ह्यात निर्बंध लागू झाले आहेत. या निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्या प्रचार करता येणार आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी लागू असल्याने उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रचारावर मर्यादा आल्याने इच्छुक उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे.‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ‘अनलॉक’च्या तिसऱ्या स्तरात केल्याने २८ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. निर्बंधाच्या या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने प्रचारावर मर्यादा आल्या आहेत. जाहीर प्रचारसभा, भव्य रॅली काढता येणार नसून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार करता येणार आहे तसेच गर्दी होतील, असे कार्यक्रमही घेता येणार नाही. सायंकाळी ४ वाजेनंतर उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रचारावर मर्यादा आल्याने उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कमी कालावधीत आणि तेही मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागणार आहे.

घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणारनिर्बंधाच्या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने जाहीर प्रचारावरही मर्यादा आल्या आहेत. समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढता येणार नसून घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्वाधिक धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...तर गुन्हा दाखल होण्याची भीतीआचारसंहिता तसेच कोरोनाविषयक नियम डावलून जाहीर प्रचार सभा, समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढली आणि याबाबत कुणी तक्रार केली तर गुन्हा दाखल होण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे रॅली, जाहीर प्रचार सभांना आवर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

राज्य शासनाने वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात केल्याने, २८ जूनपासून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील नियमावली लागू झाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. जाहीर प्रचार सभा, रॅली काढता येणार नाही. घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. कुठेही ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होईल, असा कार्यक्रम घेता येणार नाही. नवीन नियमावली व आचारसंहितेचे पालन करून प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूक