शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुक; सायंकाळी ४ पर्यंतच करता येणार जाहीर प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:11 IST

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections; निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्या प्रचार करता येणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान होत असून, जिल्ह्यात निर्बंध लागू झाले आहेत. या निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्या प्रचार करता येणार आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी लागू असल्याने उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रचारावर मर्यादा आल्याने इच्छुक उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे.‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ‘अनलॉक’च्या तिसऱ्या स्तरात केल्याने २८ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. निर्बंधाच्या या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने प्रचारावर मर्यादा आल्या आहेत. जाहीर प्रचारसभा, भव्य रॅली काढता येणार नसून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार करता येणार आहे तसेच गर्दी होतील, असे कार्यक्रमही घेता येणार नाही. सायंकाळी ४ वाजेनंतर उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रचारावर मर्यादा आल्याने उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कमी कालावधीत आणि तेही मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागणार आहे.

घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणारनिर्बंधाच्या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने जाहीर प्रचारावरही मर्यादा आल्या आहेत. समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढता येणार नसून घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्वाधिक धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...तर गुन्हा दाखल होण्याची भीतीआचारसंहिता तसेच कोरोनाविषयक नियम डावलून जाहीर प्रचार सभा, समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढली आणि याबाबत कुणी तक्रार केली तर गुन्हा दाखल होण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे रॅली, जाहीर प्रचार सभांना आवर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

राज्य शासनाने वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात केल्याने, २८ जूनपासून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील नियमावली लागू झाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. जाहीर प्रचार सभा, रॅली काढता येणार नाही. घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. कुठेही ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होईल, असा कार्यक्रम घेता येणार नाही. नवीन नियमावली व आचारसंहितेचे पालन करून प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूक