शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींची कामे ठप्प !

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

मजुरांचा अभाव असल्याचा प्रशासनाचा दावा : १०५५ कामे सुरू

वाशिम: विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही. सदर कामे मजुरांचा अभाव असल्याने रखडली असल्याचा दावा प्रशासनाने केला.मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकाराची विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षात हजारो सिंचन विहिरी या योजनेतून मंजूर झालेल्या आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ४४४८ नवीन सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत केवळ १०५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरूवात झाली. उर्वरीत कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. तसेच यापूवीर्चीही ९६४६ कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी सिंचन विहिरींच्या प्रश्नांवरून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. या आदेशामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंचन विहिरींच्या कामाने गती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा सिंचन विहिरींची कामे रखडत असल्याचे दिसून येते. मजुरांअभावी सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.वाशिम जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा लक्षात घेता, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम प्रशासनस्तरावरून राबविला जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची जोड मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. यापूर्वी दिलेल्या सिंचन विहिरींपैकी जवळपास ९६४६ कामे अपूर्ण आहेत. तसेच सन २०१६-१७ या वर्षात मंजूर असलेल्या ४४४८ पैकी आतापर्यंत केवळ १०५५ विहिरींच्या कामांना सुरूवात होऊ शकली. विशेष म्हणजे या विहिरींच्या निवडीवरून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही बरेच वादंग झाले होते. लाभार्थी निवडीवरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. लाभार्थींची निवड पंचायत समिती स्तरावरून की ग्रामसभेतून या मुद्यावरून बरेच चर्चा झाली होती. शेवटी ४४४८ लाभार्थींची निवड ईश्वरचिठ्ठीतून करण्यात आली. आता यापैकी १०५५ विहिरींची कामे सुरू आहेत. मजूरांचा अभाव असल्याने उर्वरीत विहिरींची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी मजुरांची गरजसिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी तसेच नव्याने मंजूर विहिरींच्या कामाला सुरूवात होण्यासाठी जिल्ह्यातील मजुरांनी पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात रोजगारासाठी नोंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कृती आराखड्यातील विहिरींचाही विचार व्हावा !सन २०१५-१६ या वर्षातील ग्रामसभेतून रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींनादेखील आता मान्यता देऊन कामांना सुरूवात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.