शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

विहिरींची कामे ठप्प !

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

मजुरांचा अभाव असल्याचा प्रशासनाचा दावा : १०५५ कामे सुरू

वाशिम: विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही. सदर कामे मजुरांचा अभाव असल्याने रखडली असल्याचा दावा प्रशासनाने केला.मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकाराची विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षात हजारो सिंचन विहिरी या योजनेतून मंजूर झालेल्या आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ४४४८ नवीन सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत केवळ १०५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरूवात झाली. उर्वरीत कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. तसेच यापूवीर्चीही ९६४६ कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी सिंचन विहिरींच्या प्रश्नांवरून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. या आदेशामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंचन विहिरींच्या कामाने गती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा सिंचन विहिरींची कामे रखडत असल्याचे दिसून येते. मजुरांअभावी सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.वाशिम जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा लक्षात घेता, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम प्रशासनस्तरावरून राबविला जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची जोड मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. यापूर्वी दिलेल्या सिंचन विहिरींपैकी जवळपास ९६४६ कामे अपूर्ण आहेत. तसेच सन २०१६-१७ या वर्षात मंजूर असलेल्या ४४४८ पैकी आतापर्यंत केवळ १०५५ विहिरींच्या कामांना सुरूवात होऊ शकली. विशेष म्हणजे या विहिरींच्या निवडीवरून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही बरेच वादंग झाले होते. लाभार्थी निवडीवरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. लाभार्थींची निवड पंचायत समिती स्तरावरून की ग्रामसभेतून या मुद्यावरून बरेच चर्चा झाली होती. शेवटी ४४४८ लाभार्थींची निवड ईश्वरचिठ्ठीतून करण्यात आली. आता यापैकी १०५५ विहिरींची कामे सुरू आहेत. मजूरांचा अभाव असल्याने उर्वरीत विहिरींची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी मजुरांची गरजसिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी तसेच नव्याने मंजूर विहिरींच्या कामाला सुरूवात होण्यासाठी जिल्ह्यातील मजुरांनी पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात रोजगारासाठी नोंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कृती आराखड्यातील विहिरींचाही विचार व्हावा !सन २०१५-१६ या वर्षातील ग्रामसभेतून रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींनादेखील आता मान्यता देऊन कामांना सुरूवात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.