शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

विहिरींची कामे ठप्प !

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

मजुरांचा अभाव असल्याचा प्रशासनाचा दावा : १०५५ कामे सुरू

वाशिम: विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही. सदर कामे मजुरांचा अभाव असल्याने रखडली असल्याचा दावा प्रशासनाने केला.मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकाराची विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षात हजारो सिंचन विहिरी या योजनेतून मंजूर झालेल्या आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ४४४८ नवीन सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत केवळ १०५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरूवात झाली. उर्वरीत कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. तसेच यापूवीर्चीही ९६४६ कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी सिंचन विहिरींच्या प्रश्नांवरून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. या आदेशामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंचन विहिरींच्या कामाने गती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा सिंचन विहिरींची कामे रखडत असल्याचे दिसून येते. मजुरांअभावी सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.वाशिम जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा लक्षात घेता, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम प्रशासनस्तरावरून राबविला जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची जोड मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. यापूर्वी दिलेल्या सिंचन विहिरींपैकी जवळपास ९६४६ कामे अपूर्ण आहेत. तसेच सन २०१६-१७ या वर्षात मंजूर असलेल्या ४४४८ पैकी आतापर्यंत केवळ १०५५ विहिरींच्या कामांना सुरूवात होऊ शकली. विशेष म्हणजे या विहिरींच्या निवडीवरून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही बरेच वादंग झाले होते. लाभार्थी निवडीवरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. लाभार्थींची निवड पंचायत समिती स्तरावरून की ग्रामसभेतून या मुद्यावरून बरेच चर्चा झाली होती. शेवटी ४४४८ लाभार्थींची निवड ईश्वरचिठ्ठीतून करण्यात आली. आता यापैकी १०५५ विहिरींची कामे सुरू आहेत. मजूरांचा अभाव असल्याने उर्वरीत विहिरींची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी मजुरांची गरजसिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी तसेच नव्याने मंजूर विहिरींच्या कामाला सुरूवात होण्यासाठी जिल्ह्यातील मजुरांनी पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात रोजगारासाठी नोंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कृती आराखड्यातील विहिरींचाही विचार व्हावा !सन २०१५-१६ या वर्षातील ग्रामसभेतून रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींनादेखील आता मान्यता देऊन कामांना सुरूवात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.