शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

विहिरींची कामे ठप्प !

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

मजुरांचा अभाव असल्याचा प्रशासनाचा दावा : १०५५ कामे सुरू

वाशिम: विविध कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही. सदर कामे मजुरांचा अभाव असल्याने रखडली असल्याचा दावा प्रशासनाने केला.मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकाराची विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. गत पाच वर्षात हजारो सिंचन विहिरी या योजनेतून मंजूर झालेल्या आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ४४४८ नवीन सिंचन विहिरींचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत केवळ १०५५ सिंचन विहिरींच्या कामांना सुरूवात झाली. उर्वरीत कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. तसेच यापूवीर्चीही ९६४६ कामे अपूर्ण आहेत. गतवर्षी सिंचन विहिरींच्या प्रश्नांवरून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. या आदेशामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंचन विहिरींच्या कामाने गती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा सिंचन विहिरींची कामे रखडत असल्याचे दिसून येते. मजुरांअभावी सिंचन विहिरींची कामे प्रभावित झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.वाशिम जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा लक्षात घेता, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी देण्याचा कार्यक्रम प्रशासनस्तरावरून राबविला जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची जोड मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. यापूर्वी दिलेल्या सिंचन विहिरींपैकी जवळपास ९६४६ कामे अपूर्ण आहेत. तसेच सन २०१६-१७ या वर्षात मंजूर असलेल्या ४४४८ पैकी आतापर्यंत केवळ १०५५ विहिरींच्या कामांना सुरूवात होऊ शकली. विशेष म्हणजे या विहिरींच्या निवडीवरून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही बरेच वादंग झाले होते. लाभार्थी निवडीवरून अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. लाभार्थींची निवड पंचायत समिती स्तरावरून की ग्रामसभेतून या मुद्यावरून बरेच चर्चा झाली होती. शेवटी ४४४८ लाभार्थींची निवड ईश्वरचिठ्ठीतून करण्यात आली. आता यापैकी १०५५ विहिरींची कामे सुरू आहेत. मजूरांचा अभाव असल्याने उर्वरीत विहिरींची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी मजुरांची गरजसिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी तसेच नव्याने मंजूर विहिरींच्या कामाला सुरूवात होण्यासाठी जिल्ह्यातील मजुरांनी पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात रोजगारासाठी नोंद करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कृती आराखड्यातील विहिरींचाही विचार व्हावा !सन २०१५-१६ या वर्षातील ग्रामसभेतून रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींनादेखील आता मान्यता देऊन कामांना सुरूवात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.