शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रविकासात महिलांचे योगदान मोलाचे!

By admin | Updated: March 9, 2017 02:04 IST

जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे प्रतिपादन; अधिकारांचा सक्षमपणे वापर करण्याचे आवाहन.

वाशिम, दि. ८- देशाला सार्मथ्यशाली बनविण्यामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्राचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारांचा व हक्कांचा महिलांनी सक्षमपणे वापर करावा, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार, ८ मार्च रोजी आयोजित विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, उपविभागीय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, तहसीलदार बळवंत अरखराव, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी पुढे म्हणाले, की जनगणनेनुसार आकडेवारीचा विचार केला तर अद्याप अनेक महिलांची मतदार नोंदणी झालेली नाही. त्यामुळे अशा महिलांची मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, भारतीय संविधानाने पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांनाही १९५0 मध्येच मतदानाचा अधिकार बहाल केला. राजकीय क्षेत्रातही महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले. मिळालेल्या अधिकारांचा सक्षमपणे वापर केल्यास सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात महिला चांगली कामगिरी करू शकतात, असे जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले.