शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

भाजप सरकारने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 20:00 IST

आधीच्या आणि आताच्या सरकार नावाच्या व्यवस्थेने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे .

वाशिम - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या "शेतकरी सन्मान अभियान"यात्रेने आज वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला. यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. या यात्रेच जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामस्थानी आणि शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत  केले. खासदार  राजू शेट्टी यावेळी म्हणाले, "आधीच्या आणि आताच्या सरकार नावाच्या व्यवस्थेने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे . त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे अभियान सुरू केले आहे .

शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्या करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासादायक विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रबोधन होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचा अनुभव येतोय, असा आशावाद  खासदार शेट्टींनी व्यक्त केला आहे. या अभियानाच्या निमित्ताने विदर्भ मराठवाड्यात फिरताना अनेक महिला मुले पाण्यासाठी वणवण पायपीट करत असल्याचे विदारक चित्र डोळ्याला दिसले,तरीही सरकारने अनेक तालुक्यात  दुष्काळ जाहीर केला नाही.

अनेक ठिकाणी कर्जमाफीनंतर खरीपासाठी पीककर्ज मिळत नाहीत. गरज नसताना शेतमाल आयात केल्यामुळे शेतमालाचे भाव पडले आहेत ,ऐकूनच काय तर सरकार झोपले की काय अशी शंका येते अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे शेतमालाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय सातबारा कोरा मी स्वस्थ बसणार नाही,असे ही खासदार राजू शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी