शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘घोळात’ रूतला बैलगाड्यांचा ‘चक्का’!

By admin | Updated: May 28, 2014 00:32 IST

विशेष घटक योजनेच्या बैलगाडी खरेदीत घोळ :बैलगाड्या न मिळण्याआधीच देयक पास, कृषी विभागाचा कारनामा

नागेश घोपे/ वाशिम

विशेष घटक योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बैलगाड्यांचा चक्का ह्यअर्थपूर्णह्ण घोळात रूतल्याची खळबळजनक माहीती हाती आली आहे. योजना राबविणार्‍या कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी बैलगाड्या ताब्यात मिळण्यापूर्वीच त्या सुस्थितीत प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. एवढेच नव्हे तर वित्त विभागाने या आधारे देयक पास केले असुन धनादेश देण्याच्या तयारीत लागला आहे. स्थानिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजना राबविण्यात येते. या महत्वाकांक्षी योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नविन विहीर तथा जुन्या विहीराच्या दुरूस्तीसाठी अनुदानासह कृषीपंप, बैलगाडी, बैलजोडी, कृषी अवजारे, ताडपत्री, पीव्हीसी पाईप आदी साहीत्याचा अनुदानावर पुरवठा करण्यात येतो. सन २0१३- २0१४ मध्ये बैलगाडी खरेदीसाठी दीड कोटी, ताडपंत्रीसाठी ११ लाख तर पीव्हीसी पाईप खरेदीसाठी आठ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. कृषी विभागाने सदर साहित्याची खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरेदी करण्यात आलेल्या दीड कोटी रूपयांच्या बैलगाड्यांपैकी अद्याप एकही बैलगाडी या विभागाच्या ताब्यात मिळाली नाही. मात्र केवळ कंत्राटदारांशी ह्यअर्थपूर्णह्ण संबध जोपासण्यासाठी या विभागाच्या अधिकार्‍यांनी बैलगाड्या सुस्थितीत प्राप्त झाल्या असुन देयक अदा करण्यास काहीही हरकत नसल्याचे प्रमाणपत्र वित्त विभागाकडे सादर केले आहे. कृषी अधिकार्‍यांच्या या प्रमाणपत्राचा आधार घेऊन वित्त विभागानेही संबधित कंत्राटदारांचे देयक पास केले असुन धनादेश तयार करण्याची घाई सुरू केली आहे. साहीत्य मिळाले नसताना कृषी विभागाने सुस्थितीचे दिलेले या अधारे पास केलेले देयक आदीबाबींमुळे या खरेदीच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.