शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अमरावती विभागातील शेतकऱ्यांची गव्हाच्या पेऱ्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:54 IST

वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.

ठळक मुद्देविभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही.विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत आहे.केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे.

वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.अमरावती विभागात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गहू या दोन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर होते. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५० टक्के अधिक क्षेत्रावर हरभरा, तर ३० टक्के क्षेत्रावर गहू या पिकाची पेरणी अमरावती विभागात होते. रब्बी हंगामातील सूर्यफुल आणि करडई या पिकांची पेरणी आता परवडणारी नसल्याने शेतकºयांनी या पिकांकडे गेल्या काही वर्षांपासून पाठ केल्यानंतर गहू पिकाचे क्षेत्र वाढले होेते; परंतु यंदा विभागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यातच प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केल्याने शेतकरी गहू पिक पेरण्याची जोखीम पत्करूच शकले नाहीत. प्रकल्प आटले असतानाच भूगर्भातील जलपातळी कमालीची खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. गहू या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे विहिरीतील पाणी या पिकाला पुरण्याचा विश्वास शेतकºयांना राहिला नाही. परिणामी या पिकाच्या पेºयाकडे शेतकºयांनी पाठ केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ५३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत होती; परंतु या जिल्ह्यात केवळ २० हजार ४२० हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे. अकोल्यात सरासरी २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४१६० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात सरासरी २०१०० हेक्टरपैकी ६१३०, अमरावती जिल्ह्यात सरासरी ४६ हजार ३०० हेक्टरपैकी १८३६०, तर यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ३५ हजार १०० हेक्टरपैकी केवळ ६१३० हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात यंदा एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावरही पेरणी झाली नसून, आता गव्हाच्या पेरणीला काही दिवस उरले असले तरी, पाण्याअभावी क्षेत्र वाढण्याची मुळीच शक्यता राहिली नसल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती