शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

अमरावती विभागातील शेतकऱ्यांची गव्हाच्या पेऱ्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:54 IST

वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.

ठळक मुद्देविभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही.विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत आहे.केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे.

वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.अमरावती विभागात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गहू या दोन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर होते. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५० टक्के अधिक क्षेत्रावर हरभरा, तर ३० टक्के क्षेत्रावर गहू या पिकाची पेरणी अमरावती विभागात होते. रब्बी हंगामातील सूर्यफुल आणि करडई या पिकांची पेरणी आता परवडणारी नसल्याने शेतकºयांनी या पिकांकडे गेल्या काही वर्षांपासून पाठ केल्यानंतर गहू पिकाचे क्षेत्र वाढले होेते; परंतु यंदा विभागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यातच प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केल्याने शेतकरी गहू पिक पेरण्याची जोखीम पत्करूच शकले नाहीत. प्रकल्प आटले असतानाच भूगर्भातील जलपातळी कमालीची खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. गहू या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे विहिरीतील पाणी या पिकाला पुरण्याचा विश्वास शेतकºयांना राहिला नाही. परिणामी या पिकाच्या पेºयाकडे शेतकºयांनी पाठ केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ५३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत होती; परंतु या जिल्ह्यात केवळ २० हजार ४२० हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे. अकोल्यात सरासरी २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४१६० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात सरासरी २०१०० हेक्टरपैकी ६१३०, अमरावती जिल्ह्यात सरासरी ४६ हजार ३०० हेक्टरपैकी १८३६०, तर यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ३५ हजार १०० हेक्टरपैकी केवळ ६१३० हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात यंदा एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावरही पेरणी झाली नसून, आता गव्हाच्या पेरणीला काही दिवस उरले असले तरी, पाण्याअभावी क्षेत्र वाढण्याची मुळीच शक्यता राहिली नसल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती