शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; ३३ हजार हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:48 IST

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामातील ९९ टक्के पेरणी ऊरकली आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले आहे, तथापि विषम वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादूर्भावही झाला आहे.वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने सप्टेंबर अखेरपर्यंतही जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवरही आली नव्हती. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची भीती निर्माण झाली होती. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षीत पाण्याचा अंदाज घेऊन यंदा सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला आणि आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी, तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ८० टक्के जलप्रकल्पात शंभर टक्के जलसाठा झाला. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने रब्बीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला. तथापि, जमिनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला. त्यामुळेच जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ९१ हजार ९०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी उरकली आहे. हे प्रमाण जवळपास ९९ टक्क्यांच्यावर आहे. गव्हाशिवाय जिल्ह्यात नेहमीप्रमाणे हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. तथापि, हरभºयाच्या क्षेत्रात मात्र अपेक्षीत वाढ झाली नाही. जिल्ह्यात हरभºयाचे क्षेत्र ६२ हजा ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. तृणधान्यापैकी मका वगळता इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ६९ हेक्टर असताना ११६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास ९९ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. यावेळी गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. हरभºयाचे क्षेत्रही तुलनेने बºयापैकी आहे. वातावरणातील बदलाचा पिकांवर निश्चितच परिणाम होतो. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्या. काही शंका असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधावा.- एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती