शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

वाशिम जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; ३३ हजार हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:48 IST

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामातील ९९ टक्के पेरणी ऊरकली आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले आहे, तथापि विषम वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादूर्भावही झाला आहे.वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने सप्टेंबर अखेरपर्यंतही जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवरही आली नव्हती. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची भीती निर्माण झाली होती. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षीत पाण्याचा अंदाज घेऊन यंदा सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला आणि आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी, तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ८० टक्के जलप्रकल्पात शंभर टक्के जलसाठा झाला. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने रब्बीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला. तथापि, जमिनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला. त्यामुळेच जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ९१ हजार ९०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी उरकली आहे. हे प्रमाण जवळपास ९९ टक्क्यांच्यावर आहे. गव्हाशिवाय जिल्ह्यात नेहमीप्रमाणे हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. तथापि, हरभºयाच्या क्षेत्रात मात्र अपेक्षीत वाढ झाली नाही. जिल्ह्यात हरभºयाचे क्षेत्र ६२ हजा ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. तृणधान्यापैकी मका वगळता इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ६९ हेक्टर असताना ११६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास ९९ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. यावेळी गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. हरभºयाचे क्षेत्रही तुलनेने बºयापैकी आहे. वातावरणातील बदलाचा पिकांवर निश्चितच परिणाम होतो. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्या. काही शंका असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधावा.- एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती