शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वाशिम जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; ३३ हजार हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:48 IST

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामातील ९९ टक्के पेरणी ऊरकली आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले आहे, तथापि विषम वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादूर्भावही झाला आहे.वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने सप्टेंबर अखेरपर्यंतही जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवरही आली नव्हती. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची भीती निर्माण झाली होती. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षीत पाण्याचा अंदाज घेऊन यंदा सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला आणि आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरी, तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ८० टक्के जलप्रकल्पात शंभर टक्के जलसाठा झाला. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने रब्बीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला. तथापि, जमिनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला. त्यामुळेच जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २८ हजार ४१० हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ९१ हजार ९०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी उरकली आहे. हे प्रमाण जवळपास ९९ टक्क्यांच्यावर आहे. गव्हाशिवाय जिल्ह्यात नेहमीप्रमाणे हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. तथापि, हरभºयाच्या क्षेत्रात मात्र अपेक्षीत वाढ झाली नाही. जिल्ह्यात हरभºयाचे क्षेत्र ६२ हजा ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. तृणधान्यापैकी मका वगळता इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ६९ हेक्टर असताना ११६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास ९९ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. यावेळी गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. हरभºयाचे क्षेत्रही तुलनेने बºयापैकी आहे. वातावरणातील बदलाचा पिकांवर निश्चितच परिणाम होतो. शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्या. काही शंका असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधावा.- एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती