शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करणाऱ्या ६४ जणांच्या वजनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत ...

वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत जवळपास ६४ जणांचे वजन वाढल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येतात. कोरोनावर मात केल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहारावर भर दिला जातो तसेच काही जण आराम करीत असल्याने आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने जिल्ह्यातील जवळपास ६४ जणांचे दोन ते पाच किलोदरम्यान वजन वाढल्याचे दिसून येते.

०००

एकूण कोरोना रुग्ण ७०१२

बरे झालेले ६७०७

वजन वाढल्याच्या तक्रारी ६४

००

कोरोनावर मात केल्यानंतर नियमित व्यायामावर भर द्यावा. वजन वाढेल, असा आहार टाळावा. शरीराची हालचाल होईल, असा व्यायाम करावा. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डाॅ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

०००

औषधांचा डोस

उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड दिले जाते. त्यामुळेही वजन वाढते; शिवाय आराम आणि शून्य व्यायाम याचाही परिणाम वजन वाढीवर होतो. आतापर्यंत कोरोनावर ६७०७ जणांनी मात केली आहे. त्यापैकी केवळ ६४ जणांचे वजन वाढल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उर्वरित सर्वांचे वजन स्थिर असल्याचे दिसून येते.

०००

आधी ६७; नंतर ७० किलो झाले वजन

कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी ६७ किलो वजन होते; कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहारावर भर दिला. उपचारादरम्यान औषधी घेतली. मात्र, नियमित व्यायाम न केल्याने वजन वाढले आहे. जवळपास तीन किलो वजन वाढल्याचे कोरोनावर मात केलेल्या एका जणाने सांगितले.

कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम कसा करावा, याबाबत डाॅक्टरांनी सल्ला दिला होता. सुरुवातीच्या काही दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या ठेवली. मात्र, त्यानंतर दिनचर्येत बदल झाला. त्यामुळेही वजनात वाढू होऊ शकते.

वजनात किंचितशी वाढ झाली असली तरी त्रास मात्र कोणताही नाही. वजन कमी करण्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम आणि आहारावर भर देण्यात येत आहे, असेही कोरोनावर मात केलेल्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत ७०१२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापैकी ६७०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्यच म्हणावे लागेल. योग्य आहार, व्यायामावर भर देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.