शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

कोरोनावर मात करणाऱ्या ६४ जणांच्या वजनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत ...

वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत जवळपास ६४ जणांचे वजन वाढल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येतात. कोरोनावर मात केल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहारावर भर दिला जातो तसेच काही जण आराम करीत असल्याने आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने जिल्ह्यातील जवळपास ६४ जणांचे दोन ते पाच किलोदरम्यान वजन वाढल्याचे दिसून येते.

०००

एकूण कोरोना रुग्ण ७०१२

बरे झालेले ६७०७

वजन वाढल्याच्या तक्रारी ६४

००

कोरोनावर मात केल्यानंतर नियमित व्यायामावर भर द्यावा. वजन वाढेल, असा आहार टाळावा. शरीराची हालचाल होईल, असा व्यायाम करावा. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डाॅ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

०००

औषधांचा डोस

उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड दिले जाते. त्यामुळेही वजन वाढते; शिवाय आराम आणि शून्य व्यायाम याचाही परिणाम वजन वाढीवर होतो. आतापर्यंत कोरोनावर ६७०७ जणांनी मात केली आहे. त्यापैकी केवळ ६४ जणांचे वजन वाढल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उर्वरित सर्वांचे वजन स्थिर असल्याचे दिसून येते.

०००

आधी ६७; नंतर ७० किलो झाले वजन

कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी ६७ किलो वजन होते; कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहारावर भर दिला. उपचारादरम्यान औषधी घेतली. मात्र, नियमित व्यायाम न केल्याने वजन वाढले आहे. जवळपास तीन किलो वजन वाढल्याचे कोरोनावर मात केलेल्या एका जणाने सांगितले.

कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम कसा करावा, याबाबत डाॅक्टरांनी सल्ला दिला होता. सुरुवातीच्या काही दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या ठेवली. मात्र, त्यानंतर दिनचर्येत बदल झाला. त्यामुळेही वजनात वाढू होऊ शकते.

वजनात किंचितशी वाढ झाली असली तरी त्रास मात्र कोणताही नाही. वजन कमी करण्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम आणि आहारावर भर देण्यात येत आहे, असेही कोरोनावर मात केलेल्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत ७०१२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापैकी ६७०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्यच म्हणावे लागेल. योग्य आहार, व्यायामावर भर देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.