शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

कोरोनावर मात करणाऱ्या ६४ जणांच्या वजनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत ...

वाशिम : कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहार, आराम आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने काही जणांचे वजन वाढत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत जवळपास ६४ जणांचे वजन वाढल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येतात. कोरोनावर मात केल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहारावर भर दिला जातो तसेच काही जण आराम करीत असल्याने आणि उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड मिळाल्याने जिल्ह्यातील जवळपास ६४ जणांचे दोन ते पाच किलोदरम्यान वजन वाढल्याचे दिसून येते.

०००

एकूण कोरोना रुग्ण ७०१२

बरे झालेले ६७०७

वजन वाढल्याच्या तक्रारी ६४

००

कोरोनावर मात केल्यानंतर नियमित व्यायामावर भर द्यावा. वजन वाढेल, असा आहार टाळावा. शरीराची हालचाल होईल, असा व्यायाम करावा. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डाॅ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

०००

औषधांचा डोस

उपचारादरम्यान औषधाच्या रूपातून स्टेरॉईड दिले जाते. त्यामुळेही वजन वाढते; शिवाय आराम आणि शून्य व्यायाम याचाही परिणाम वजन वाढीवर होतो. आतापर्यंत कोरोनावर ६७०७ जणांनी मात केली आहे. त्यापैकी केवळ ६४ जणांचे वजन वाढल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उर्वरित सर्वांचे वजन स्थिर असल्याचे दिसून येते.

०००

आधी ६७; नंतर ७० किलो झाले वजन

कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी ६७ किलो वजन होते; कोरोनावर मात केल्यानंतर पोषक आहारावर भर दिला. उपचारादरम्यान औषधी घेतली. मात्र, नियमित व्यायाम न केल्याने वजन वाढले आहे. जवळपास तीन किलो वजन वाढल्याचे कोरोनावर मात केलेल्या एका जणाने सांगितले.

कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम कसा करावा, याबाबत डाॅक्टरांनी सल्ला दिला होता. सुरुवातीच्या काही दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या ठेवली. मात्र, त्यानंतर दिनचर्येत बदल झाला. त्यामुळेही वजनात वाढू होऊ शकते.

वजनात किंचितशी वाढ झाली असली तरी त्रास मात्र कोणताही नाही. वजन कमी करण्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम आणि आहारावर भर देण्यात येत आहे, असेही कोरोनावर मात केलेल्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत ७०१२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापैकी ६७०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर वजन वाढण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्यच म्हणावे लागेल. योग्य आहार, व्यायामावर भर देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.