शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या खचलेल्या कडांमुळे अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 19:05 IST

मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे.

वाशिम, दि. 25 - मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे. शहरालगत असलेल्या मानोरा मार्गावरील अरुणावती नदीच्या पुलाचे कठडे पूर्णपणे खचल्यामुळे येथून वाहनधारकांना काळजीपूर्वकच वाहन चालवावे लागत असल्याचे पाहायला मिळते. याची बांधकाम विभागाने दखल घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मंगरुळपीर शहराच्या बाहेरून अरू णावती ही नदी वाहते.  शहरातून जाणाºया मानोरा मार्गावर या नदीवर वाहतुकीसाठी अनेक वर्षांपूर्वी एक पूल बांधण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पुलाची अवस्था गंभीर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या कडा खचल्या असून, भिंतीही जीर्ण झाल्या आहेत. या पुलाची उंचीही खूप कमी आहे. एखाद वेळी नदीला पूर आल्यास पुलावरून फुट, दोन फूट पाणी वाहते. अशात पुल दिसतही नाही. त्यामुळे वाहनधारकांनी पुलावरून पाणी वाहत असताना वाहन नेण्याचा प्रयत्न केल्यास अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यातच पुलाची रुंदी कमी असल्याने वाहनांची वर्दळ वाढून एकाच वेळी दोन तीन वाहने पुलावर आल्यास मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एखादे वाहन पुलावरून खाली कोसळून मोठा अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हीच स्थिती असतानाही बांधकाम विभागाच्यावतीने या पुलाची उंची वाढविणेच काय, तर पुलास कठडे बसविण्याची तसदीही घेतली नाही.