शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पाणी पुरवठ्यास असमर्थ पालिकेने पाणीपट्टी रद्द करावी  - नगरसेवकाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:26 IST

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या नगराध्यक्षांना गुरुवारी पत्रही सादर केले आहे. सध्या मंगरुळपीर शहरात पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. मोतसावंगा धरण आटल्यामुळे शहरातीन नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नळधारक व इतर नागरिक खाजगी टँकरचा आधार घेत आहेत. तथापि, आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेले नागरिक आणि गुरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. तब्बल २० ते २५ दिवसांनी नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्याने पिण्यासाठीच काय, तर इतर वापरासाठीही हे पाणी घातक ठरत आहे. त्यामुळे आजाराची साथ पसरण्याची भिती आहे. अर्थात नागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली असून, पाणीपट्टी कर, नळाचा कर मागण्याचा अधिकारही गमावून बसली असून, ही स्थिती लक्षात घेता नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करणे गैरकायदेशीर ठरेल, त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :WaterपाणीMangrulpirमंगरूळपीर