शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
5
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
7
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
8
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
9
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
10
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
11
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
12
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
13
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
14
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
15
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
16
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
17
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
18
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
19
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
20
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यंदाही पाणीटंचाई!

By admin | Updated: May 30, 2017 01:31 IST

प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास ‘खो’ : नागरिकांची पाण्यासाठी कोसोदुर पायपीट

धनंजय कपाले / बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम-मानोरा : गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यावर्षीही पाणीटंचाई उद्भवलेली असतानाही, टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.गतवर्षी वाशिम तालुक्यातील माळेगाव, अंजनखेड, भोयता, काकडदाती, बाभूळगाव, फाळेगाव, दगडउमरा, वांगी, पिंपळगाव (डा.बं.), कोंडाळा महाली, बोरी बु., धानोरा बु., पार्डी आसरा, सुरकुंडी, दोडकी, वाळकी जहॉगीर, कार्ली, शेलु बु., हिवरा रोहिला आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या टँकरवर ५१ कोटी ६३ लाख रुपये खर्च झाले होते. यापैकी माळेगाव व अंजनखेडा या दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरीत गावांना टँकरची प्रतीक्षा आहे. कोंडाळा महाली येथे भीषण पाणीटंचाई असतानाही टँकर सुरू नाही. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा नेला होता. यंदा पाण्याची टंचाई एप्रिल पासूनच निर्माण झाली. पाणी टंचाईमुळे गावातील महिलांना अर्धा ते एक किलोमिटर पर्यंत पायदळ जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते. काही शेतकरी आपल्या शेतामधून बैलगाडी मध्ये पाणी घेऊन येतात. या गावामध्ये दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. गतवर्षी उन्हाळ्यामध्ये कार्ली गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने टँकरची व्यवस्था केली. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. याशिवाय गावातील विहिरीमधील गाळ उपसा करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा गावामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय गावामध्ये खासगी पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांना कोणतीच अडचण भासत नाही. मानोरा : गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या काही गावांनी विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. मात्र, अद्याप विहिर अधिग्रहण झाले नाही. गतवर्षी उज्वलनगर, पाळोदी, हिवरा खु., सावरगाव फॉरेस्ट, रणजित नगर, दापुरा बु. व दापुरा खुर्द, इंझोरी, ढोणी, कुपटा, चोंढी, जनुना खु. आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर ३७ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाले होते. त्यापैकी यावर्षी केवळ उज्वलनगर व रणजितनगर येथेच टँकरने पाणी पुरवठा केला आहे. उर्वरीत गावांत पाणीटंचाई असतानादेखील टँकर सुरू केले नाही. तालुक्यातील उज्वलनगर, रणजीतनगर, ढोणी गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर अकरा ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणसाठी प्रस्ताव पाठविले.ढोणी येथे अद्याप टँकर सुरू झाले नाही. पाणी टंचाईचे तीव्र चटके जाणवू लागण्याआधीच उज्वलनगर, रणजीतनगर, हळदा, ढोणी, गलमगाव, वापटा, शेंदुरजना अढाव, सावरगाव फॉरेस्ट, हातना, मेंद्रा, इंगलवाडी आणि आमगव्हाण येथे विहीर अधिग्रहणासाठी ग्राम पंचायतच्यावतीने ठराव पाठविण्यात आले; परंतु अद्याप पावेतो विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या नाही. याकडे स्थानिक पंचायत समितीसह जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.