शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यंदाही पाणीटंचाई!

By admin | Updated: May 30, 2017 01:31 IST

प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास ‘खो’ : नागरिकांची पाण्यासाठी कोसोदुर पायपीट

धनंजय कपाले / बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम-मानोरा : गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यावर्षीही पाणीटंचाई उद्भवलेली असतानाही, टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.गतवर्षी वाशिम तालुक्यातील माळेगाव, अंजनखेड, भोयता, काकडदाती, बाभूळगाव, फाळेगाव, दगडउमरा, वांगी, पिंपळगाव (डा.बं.), कोंडाळा महाली, बोरी बु., धानोरा बु., पार्डी आसरा, सुरकुंडी, दोडकी, वाळकी जहॉगीर, कार्ली, शेलु बु., हिवरा रोहिला आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या टँकरवर ५१ कोटी ६३ लाख रुपये खर्च झाले होते. यापैकी माळेगाव व अंजनखेडा या दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरीत गावांना टँकरची प्रतीक्षा आहे. कोंडाळा महाली येथे भीषण पाणीटंचाई असतानाही टँकर सुरू नाही. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा नेला होता. यंदा पाण्याची टंचाई एप्रिल पासूनच निर्माण झाली. पाणी टंचाईमुळे गावातील महिलांना अर्धा ते एक किलोमिटर पर्यंत पायदळ जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते. काही शेतकरी आपल्या शेतामधून बैलगाडी मध्ये पाणी घेऊन येतात. या गावामध्ये दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. गतवर्षी उन्हाळ्यामध्ये कार्ली गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने टँकरची व्यवस्था केली. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. याशिवाय गावातील विहिरीमधील गाळ उपसा करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा गावामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय गावामध्ये खासगी पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांना कोणतीच अडचण भासत नाही. मानोरा : गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या काही गावांनी विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. मात्र, अद्याप विहिर अधिग्रहण झाले नाही. गतवर्षी उज्वलनगर, पाळोदी, हिवरा खु., सावरगाव फॉरेस्ट, रणजित नगर, दापुरा बु. व दापुरा खुर्द, इंझोरी, ढोणी, कुपटा, चोंढी, जनुना खु. आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर ३७ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाले होते. त्यापैकी यावर्षी केवळ उज्वलनगर व रणजितनगर येथेच टँकरने पाणी पुरवठा केला आहे. उर्वरीत गावांत पाणीटंचाई असतानादेखील टँकर सुरू केले नाही. तालुक्यातील उज्वलनगर, रणजीतनगर, ढोणी गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर अकरा ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणसाठी प्रस्ताव पाठविले.ढोणी येथे अद्याप टँकर सुरू झाले नाही. पाणी टंचाईचे तीव्र चटके जाणवू लागण्याआधीच उज्वलनगर, रणजीतनगर, हळदा, ढोणी, गलमगाव, वापटा, शेंदुरजना अढाव, सावरगाव फॉरेस्ट, हातना, मेंद्रा, इंगलवाडी आणि आमगव्हाण येथे विहीर अधिग्रहणासाठी ग्राम पंचायतच्यावतीने ठराव पाठविण्यात आले; परंतु अद्याप पावेतो विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या नाही. याकडे स्थानिक पंचायत समितीसह जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.