शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पावसाळ्यातही १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा!

By admin | Updated: August 15, 2015 00:31 IST

वाशिम जिल्ह्यात सात टँकर, अमरावती विभागात ३७ टँकर.

संतोष वानखडे /वाशिम : पावसाळ्याला सुरूवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तथापि, राज्यातील काही गावे व वाड्यांमध्ये अद्यापही पाणीटंचाईची धग कायम आहे. राज्यातील १७५१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, यामध्ये अमरावती विभागातील २१ गावांमधील ३७ टँकरचा समावेश असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. विविध कारणांमुळे ऋतूमानात बदल होत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी घेत आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात, हे साहजिक आहे; मात्र भरपावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, ही विदारक स्थिती आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाच्या १0 ऑगस्ट २0१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये २0४ शासकीय व १५४७ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा १५५६ असा होता. यावर्षी जून महिन्यात सुरूवातीला दमदार पाऊस झाला; मात्र जुलै महिन्यात पाऊस फितूर झाल्याने राज्यात १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या कोरड्या घशाला पाण्याचा ओलावा देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे तब्बल ११८८ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. अमरावती विभागात अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याने एकही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. वाशिम जिल्ह्यात दोन गावांत सात टँकर आणि बुलडाणा जिल्ह्यात १९ गावात ३0 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे २0, सातारा २७, सांगली २८, सोलापूर ८ असे एकूण ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात ४४३ टँकर सुरू आहेत.