शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

पावसाळ्यातही १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा!

By admin | Updated: August 15, 2015 00:31 IST

वाशिम जिल्ह्यात सात टँकर, अमरावती विभागात ३७ टँकर.

संतोष वानखडे /वाशिम : पावसाळ्याला सुरूवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तथापि, राज्यातील काही गावे व वाड्यांमध्ये अद्यापही पाणीटंचाईची धग कायम आहे. राज्यातील १७५१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, यामध्ये अमरावती विभागातील २१ गावांमधील ३७ टँकरचा समावेश असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. विविध कारणांमुळे ऋतूमानात बदल होत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी घेत आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात, हे साहजिक आहे; मात्र भरपावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, ही विदारक स्थिती आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाच्या १0 ऑगस्ट २0१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये २0४ शासकीय व १५४७ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा १५५६ असा होता. यावर्षी जून महिन्यात सुरूवातीला दमदार पाऊस झाला; मात्र जुलै महिन्यात पाऊस फितूर झाल्याने राज्यात १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या कोरड्या घशाला पाण्याचा ओलावा देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे तब्बल ११८८ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. अमरावती विभागात अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याने एकही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. वाशिम जिल्ह्यात दोन गावांत सात टँकर आणि बुलडाणा जिल्ह्यात १९ गावात ३0 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे २0, सातारा २७, सांगली २८, सोलापूर ८ असे एकूण ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात ४४३ टँकर सुरू आहेत.