शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पावसाळ्यातही १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा!

By admin | Updated: August 15, 2015 00:31 IST

वाशिम जिल्ह्यात सात टँकर, अमरावती विभागात ३७ टँकर.

संतोष वानखडे /वाशिम : पावसाळ्याला सुरूवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तथापि, राज्यातील काही गावे व वाड्यांमध्ये अद्यापही पाणीटंचाईची धग कायम आहे. राज्यातील १७५१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, यामध्ये अमरावती विभागातील २१ गावांमधील ३७ टँकरचा समावेश असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. विविध कारणांमुळे ऋतूमानात बदल होत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी घेत आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात, हे साहजिक आहे; मात्र भरपावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, ही विदारक स्थिती आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाच्या १0 ऑगस्ट २0१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये २0४ शासकीय व १५४७ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा १५५६ असा होता. यावर्षी जून महिन्यात सुरूवातीला दमदार पाऊस झाला; मात्र जुलै महिन्यात पाऊस फितूर झाल्याने राज्यात १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या कोरड्या घशाला पाण्याचा ओलावा देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे तब्बल ११८८ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. अमरावती विभागात अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याने एकही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. वाशिम जिल्ह्यात दोन गावांत सात टँकर आणि बुलडाणा जिल्ह्यात १९ गावात ३0 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे २0, सातारा २७, सांगली २८, सोलापूर ८ असे एकूण ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात ४४३ टँकर सुरू आहेत.