शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पाणीपुरवठा योजना पुनरूज्जीवनाचा प्रश्न रेंगाळला!

By admin | Updated: February 7, 2017 03:08 IST

२५ गावांची पाण्यासाठी भटकंती : ३.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर; मात्र कामे सुरू होण्याची प्रतीक्षा कायम.

सुनील काकडे वाशिम, दि. ६- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत उंबर्डाबाजार (ता. कारंजा) येथील नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि म्हसणी (ता. मानोरा) येथील १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवनासाठी ३.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; मात्र पुनरूज्जीवनाच्या एकाही कामास अद्याप प्रारंभ झाला नसून, २५ गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार आणि मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरूज्जीवीत करण्यासाठी ३१ डिसेंबरला शासनाकडून ३.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार ९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत अनेक वर्षांपासून बंद आहे. परिणामी, परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर योजना आजही बंदच असल्यामुळे दिघी, मनभा, दोनद बु., यावर्डी, येवता, वडगाव रंगे, सोमठाणा, जनुना पिंप्री आदी गावांनादेखील पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने परिसरातील तोरनाळा, जामदरा, इंझोरी, वाघोडा, मोहगव्हाण, दापूरा, धानोरा भुसे, जनुना खुर्द, कुपटा, नायनी, रुद्राळा, उंबर्डा, चौसाळा, चोंडी, वापटा आदी गावांमधील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील सदर दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने पुरेसा निधी मंजूर केला; मात्र तो अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याने पुनरूज्जीवनाची कुठलीच कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने मध्यंतरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनाच्या ह्यटेंडर प्रोसेसिंगह्णचे काम थांबले; मात्र आता या कामांना निश्‍चितपणे गती मिळणार असून, उंबर्डाबाजार ९ गावे आणि म्हसणी १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनाची कामे मार्गी लागतील. यासह जिल्ह्यातील इतर ८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्तावदेखील शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. - के. के. जीवनेकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम