शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

रिसोड तालुक्यातील २० गावांना पाणीटंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:41 IST

रिसोड : रिसोड तालुक्यातील २० गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, तीन ठिकाणी बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

रिसोड : रिसोड तालुक्यातील २० गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, तीन ठिकाणी बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात आले तर करंजी गरड येथे टँकर सुरु करण्यात आले आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला रिसोड तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील करंजी गरड या गावाला दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदादेखील करंजी गरड येथे पाणीटंचाई असल्याने टँकर सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी अनेक गावात पाणीटंचाईची तीव्रता देखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी ३४ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास ४ ठिकाणी विहिरी व बोअर अधिग्रहण केले होते तर एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा १० विहिरी व एक बोअर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील धोडप बु , लोणी बु, वडजी, पेनबोरी, देगाव, भोकरखेडा, वाडीरायताळ, गोवर्धन, सवड, येवती, मसलापेन, मांगुळ झनक, लोणी खु, आसोला, व्याड, शेलगाव राजगुरे, चाकोली, कवठा, गणेशपूर, पांचाबा या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावांतील महिलांना शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतु, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. नळयोजना दुरुस्तीमध्ये

व्याड, शेलगाव, चाकोली, कवठा, गणेशपूर, पाचांबा ही गावे आहेत.

यावर्षी तहसील कार्यालयात पाच तर पंचायत समिती कार्यालयात सात असे एकूण १२ गावातून विहीर व बोअर अधिग्रहणाकरिता प्रस्ताव आले आहेत.

तसेच गत वर्षी १३ मेपर्यंत करंजी गरड येथे टँकर सुरू होते. तर ३ विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले होते.

०००

कोट बॉक्स

रिसोड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी प्रमाणात पाणीटंचाई आहे. काही गावातील विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढू तसेच करंजी गरड या गावात नियमित टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

संतोष आष्टीकर

गटविकास अधिकारी, पं. स. रिसोड