शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या गावातही पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 16:01 IST

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जवळपास १०० पेक्षा अधिक गावांत तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जाते. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने उपरोक्त ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूली गावे असल्याने आणि कृषी विभागाच्या लेखी ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असल्याने उर्वरीत ३२४ गावांत पाणीटंचाई निर्माण होणे अपेक्षीत होते. मात्र, जिल्हा प्रशासनानेच जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई जाहिर करून कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यामुळे येथे नेमकी चुक कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असेल तर ५०० गावांत कोणत्या आधारावर पाणीटंचाई जाहिर करण्यात आली आणि ५०० गावांत खरोखरच पाणीटंचाई असेल तर ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये कोणत्या आधारावर करण्यात आला, या दृष्टिने पडताळणी होणे आवश्यक ठरत आहे.

वॉटर न्यूट्रल यादीतील गावांचे फेरसर्वेक्षण झाल्यास वस्तुस्थिती येईल समोर !शेती प्रयोजनाकरिता लागणाºया पाण्यासह जनावरे, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या तालुकास्तरीय समितीकडून सर्वेक्षण केले जाते. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी असतात. त्या-त्या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी काढली जाते. १०० टक्केवारी असलेल्या गावाची पाण्याची गरज पूर्ण झाल्याची शहानिशा केली जाते. त्यानंतरच संबंधित गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश केला जातो. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई असल्याने फेर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेकवेळा केली. मात्र, अद्याप फेर सर्वेक्षण करण्यात आले नाही.

सन २०१५-१६ मध्ये २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल ठरली आहेत. सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जवळपास १४०० कामे पूर्ण झाली आहेत.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई