शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाशिम जिल्ह्यात शेडनेट’लाही बसला भीषण पाणीटंचाईचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:55 IST

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कधीकाळी ५०० च्या आसपास शेडनेट उभे होऊन त्याव्दारे शेतकरी संरक्षित शेती करायला लागले होते. मात्र, प्रतिकुल हवामान, तापमानात होत असलेली वाढ आणि भीषण पाणीटंचाईमुळे बहुतांश ठिकाणचे शेडनेट निकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर पोहचले असून शेतशिवारांमधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. यामुळे शेडनेटमध्ये पीक घेणे जवळपास अशक्य ठरत असल्याने लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले शेडनेट तसेच निकामी पडून असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कधीकाळी ५०० च्या आसपास शेडनेट उभे होऊन त्याव्दारे शेतकरी संरक्षित शेती करायला लागले होते. मात्र, प्रतिकुल हवामान, तापमानात होत असलेली वाढ आणि भीषण पाणीटंचाईमुळे बहुतांश ठिकाणचे शेडनेट निकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

वाशिम-शेलूबाजार मार्गावर विविध ठिकाणी शेतात शेडनेट उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यात भाजीपाला अथवा इतर पिकांची लागवड करायची झाल्यास पाण्याची उपलब्धी आवश्यक असण्यासोबतच तापमानही ठराविक असणे अत्यावश्यक आहे. मात्र, सद्य:स्थितीत तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर पोहचले असून शेतशिवारांमधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. यामुळे शेडनेटमध्ये पीक घेणे जवळपास अशक्य ठरत असल्याने लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले शेडनेट तसेच निकामी पडून असल्याचे दिसून येत आहे. अशातच अधूनमधून सुसाट्याचा वारा देखील सुटत असल्याने काही शेडनेट फाटून केवळ पाईपच शेतात उभे असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. या बिकट स्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी पर्जन्यमानाची टक्केवारी वाढून शेतशिवार हिरवेगार होतील, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती