शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

गावांमध्ये जलसंवर्धनासाठी जलरक्षकांची नियुक्ती

By admin | Updated: March 19, 2016 01:18 IST

वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम

वाशिम: सध्या पाणीटंचाईचे संकट भीषण रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज झाली आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे रूप देण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात गावागावांमध्ये जलरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जलरक्षण गावातील जलसंवर्धन व जलवापरावर लक्ष ठेवणार आहेत. पर्यावरणाच्या र्‍हासामुळे पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाते. गत काही वर्षांपासून सरासरीएवढा पाऊस पडत असला तरी धरणे, नदी, नाले कोरडे असून, दुष्काळ कायम आहे. त्यामुळे गावागावांत पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याकरिता गावागावांतच पाणी अडविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गावातच जलसंवर्धन करण्याकरिता जलरक्षकांची निवड करण्यात आली आहे. जलसंवर्धनासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानासह विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात जलसंवर्धन करून जलसाठा वाढविण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता वाशिम जिल्हा परिषदेने स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जलरक्षकांची नेमणूक केली आहे. जलसुरक्षक हे पाण्याचे संरक्षक असून, गावाला शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या संकटप्रसंगी गावकर्‍यांना मदत करण्यासह पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यामध्ये पडणारे पाणी कसे संवर्धित करता येईल, पेरणी करताना कोणत्या पिकांची पेरणी करावी, याचेही नियोजन करावे लागणार आहे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार शेतकर्‍यांनी पिकांचे नियोजन करून जास्त पाणी लागणार्‍या पिकांची पेरणी न करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्याची जबाबदारी जलरक्षकांवर सोपविण्यात आली आहे.