शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये जलसंवर्धनासाठी जलरक्षकांची नियुक्ती

By admin | Updated: March 19, 2016 01:18 IST

वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम

वाशिम: सध्या पाणीटंचाईचे संकट भीषण रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज झाली आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे रूप देण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात गावागावांमध्ये जलरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जलरक्षण गावातील जलसंवर्धन व जलवापरावर लक्ष ठेवणार आहेत. पर्यावरणाच्या र्‍हासामुळे पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाते. गत काही वर्षांपासून सरासरीएवढा पाऊस पडत असला तरी धरणे, नदी, नाले कोरडे असून, दुष्काळ कायम आहे. त्यामुळे गावागावांत पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याकरिता गावागावांतच पाणी अडविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गावातच जलसंवर्धन करण्याकरिता जलरक्षकांची निवड करण्यात आली आहे. जलसंवर्धनासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानासह विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात जलसंवर्धन करून जलसाठा वाढविण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता वाशिम जिल्हा परिषदेने स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जलरक्षकांची नेमणूक केली आहे. जलसुरक्षक हे पाण्याचे संरक्षक असून, गावाला शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या संकटप्रसंगी गावकर्‍यांना मदत करण्यासह पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यामध्ये पडणारे पाणी कसे संवर्धित करता येईल, पेरणी करताना कोणत्या पिकांची पेरणी करावी, याचेही नियोजन करावे लागणार आहे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार शेतकर्‍यांनी पिकांचे नियोजन करून जास्त पाणी लागणार्‍या पिकांची पेरणी न करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्याची जबाबदारी जलरक्षकांवर सोपविण्यात आली आहे.