शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जलसंधारण विभागाला हवे अतिरिक्त ३१५ कोटी; मंजूर केवळ ३५ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

संतोष वानखडे वाशिम : साठवण तलावांचे पाझर तलावात रुपांतर, सिंचनासाठी पाईप व्यवस्था, लघु प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती, साठवण बंधाऱ्यांची निर्मिती ...

संतोष वानखडे

वाशिम : साठवण तलावांचे पाझर तलावात रुपांतर, सिंचनासाठी पाईप व्यवस्था, लघु प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती, साठवण बंधाऱ्यांची निर्मिती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने २०२० - २१मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडे अतिरिक्त ३१५ कोटींच्या निधीची मागणी नोंदविली होती. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याने देखभाल दुरूस्तीची कामे कशी करावी? असा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

ग्रामीण भागात सिंचनाची सुविधा निर्माण करणे, जलपातळीत वाढ करणे आदींसाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे लघु प्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव, कालवे दुरूस्तीची कामे केली जातात. लघु प्रकल्प, साठवण व पाझर तलाव, कालवे आदींची आयुर्मर्यादा साधारणत: ४० ते ४५ वर्षे असते. बहुतांश प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपत येत असल्याने देखभाल दुरूस्ती होणे गरजेचे ठरत आहे. मात्र, पुरेसा निधी नसल्याने देखभाल दुरूस्ती कशी करावी? हा पेच आहे. नवीन साठवण तलाव, जुन्या साठवण तलावाचे पाझर तलावात रुपांतर, प्रवाही सिंचन योजनेंतर्गतचे अनेक कालवे नादुरूस्त असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पाईपलाईन टाकणे, आयुर्मर्यादा संपत आलेल्या प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती आदींसाठी जलसंधारण विभागाला जवळपास ३१५ कोटींच्या अतिरिक्त निधीची गरज आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून हा निधी मिळावा, याकरिता जलसंधारण विभागाने गतवर्षी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. यापैकी केवळ ३५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. निधी मात्र अद्याप मिळाला नाही. निधीअभावी प्रकल्पांच्या देखभाल, दुरूस्तीची कामे प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

०००

असा होता प्रस्ताव

कामे अपेक्षित निधी

साठवण बंधारे १५० कोटी

पाईप व्यवस्था ९० कोटी

साठवण तलावाचे पाझर

तलावात रुपांतर ३० कोटी

योजनांची देखभाल

दुरूस्ती ४५ कोटी

०००००००००

पाणी गळती रोखण्यासाठी दुरूस्ती आवश्यक

रब्बी हंगामात लघु सिंचन प्रकल्पातून अनेक शेतकरी पिकांसाठी पाणी घेतात. देखभाल, दुरूस्तीअभावी काही प्रकल्पांतून पाणी गळती होते. पाणीगळती रोखण्यासाठी या प्रकल्पांची दुरूस्ती आवश्यक ठरत आहे. यासाठी शासनाकडून निधी केव्हा मिळणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.