शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कडक निर्बंधांना वाशिमकरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात रविवार, ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून पुढील सात दिवसांसाठी कडक ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात रविवार, ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून पुढील सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू झाले असून, पहिल्याच दिवशी वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू आहे. तथापि, कोरोनाचा कहर सुरूच असल्याने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात ९ मे ते १५ मे यादरम्यान कडक निर्बंधांसंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ७ मे रोजी आदेश जारी केले. कडक निर्बंधांबाबत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहेत. कडक निर्बंधांची अंमलबजावणी रविवार, ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून झाली असून, पहिल्याच दिवशी वाशिमसह रिसोड, कारंजा, मालेगाव, शिरपूर, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, शेलुबाजार, कामरगाव, आसेगाव, केनवड यासह प्रमुख ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, सात दिवस कडक निर्बंध असल्याने रविवारी सकाळी ७ ते ११ या दरम्यान बाजारपेठ, भाजीबाजार, पेट्रोल पंप, एटीएम आदी ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी दिसून आली. शहरातील सर्वच पेट्रोल पंप परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना एक ते दोन रांगांत यावे लागले. सात दिवस घरातच राहावे लागणार असल्याची कल्पना असूनही पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे पाहून आश्चर्यही व्यक्त केले जात होते. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी कडक निर्बंधांदरम्यान सात दिवस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.

०००००००००००००

प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त

वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, शिरपूर, अनसिंग, शेलुबाजार आदी ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाशिम, शिरपूर, मालेगाव, कारंजा येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईदेखील करण्यात आली. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणीही रस्त्यावर फिरू नये, अन्यथा कडक निर्बंध संपेपर्यंत अर्थात १५ मेपर्यंत वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

०००००