शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देवतलावासाठी वाशिमकरांना पुन्हा कळकळीची हाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:47 IST

वाशिम :  प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेवतलावातील घाण तसेच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील सर्व समाजातील नागरिक व जनता आपले भेदभाव विसरुन तनमनधनाने पुढे सरसावले. देवतलाव पुर्नजीवनाचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी वाशिमकर नागरिकांनी पुन्हा एकदा सढळ हाताने दानराशी देण्याची गरज आहे.

- शिखरचंद बागरेचा 

वाशिम :  प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे.

शहराच्या मध्यभागी बालाजी मंदिराला लागुन असलेले देवतलाव मागील काही वर्षापासुन अनियमित पावसाअभावी सातत्याने कोरडे पडत आहेत. सदर तलाव कोरडे पडल्यामुळे सन १९७२ नंतर म्हणजेच तब्बल ४६ वर्षानंतर वाशिम शहराची पाणी पातळी अत्यंत खोलात गेली आहे. भिषण पाणी टंचाईमुळे वाशिमसह परिसरातील नागरिक तसेच पशुपक्षी व सर्व प्राणी मात्रांची पाण्यांसाठी वनवन भटकंती सुुरु आहे. भविष्यात पाणी टंचाइृचा सामना करण्याची वेळ नवीन पिढीवर येवु नये म्हणुन शहरातील समाजसेवी युवकांनी ‘मी वाशिमकर’ या गु्रपची स्थापना करण्यात आली व देवतलावातील घाण तसेच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. वाशिमकर ग्रुपचे परिश्रम व मेहनत पाहता शहरातील सर्व समाजातील नागरिक व जनता आपले भेदभाव विसरुन या ज्वलंत समस्येचे निराकरण करण्यासाठी तनमनधनाने पुढे सरसावले. शहरातील सर्व सामाजिक व स्वयंसेवी संस्था ,शासकीय व निमशासकीय संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवतलावात प्रत्यक्षरित्या मेहनत करुन देवतलावाचे गाळ उपसण्यासोबतच त्याचे खोलीकरण करण्यात यश मिळविले.या महत कार्याला सर्वसामाजिक संघटना ,समाजसेवी संस्था, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनासह इतर सर्वांनी परिश्रमासोबतच सढळ हाताने दानराशी देवुन आपला हातभार लावला आहे. या तलावाचे कार्य अंतीम टप्यात सुरु असुन देवतलाव पुर्नजीवनाचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी वाशिमकर नागरिकांनी पुन्हा एकदा सढळ हाताने दानराशी देण्याची गरज आहे. वाशिमकरांच्या संयुक्त व एकत्रीकरणाने आगामी पावसाळ्यात देवतलाव तुडूंब भरुन पुढील शंभर वर्षात वाशिम नगरीत दुष्काळ परिस्थिती उदभवणार नाही यासाठी मी वाशिमकर ग्रुप अगदी तन्मयतेने परिश्रम घेत आहेत. देवतलावाचे सुरु असलेले कार्य पाहता वाशिमकर नागरिकांकडून या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक व कुतुहल व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिम