शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

देवतलावासाठी वाशिमकरांना पुन्हा कळकळीची हाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:47 IST

वाशिम :  प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेवतलावातील घाण तसेच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील सर्व समाजातील नागरिक व जनता आपले भेदभाव विसरुन तनमनधनाने पुढे सरसावले. देवतलाव पुर्नजीवनाचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी वाशिमकर नागरिकांनी पुन्हा एकदा सढळ हाताने दानराशी देण्याची गरज आहे.

- शिखरचंद बागरेचा 

वाशिम :  प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे.

शहराच्या मध्यभागी बालाजी मंदिराला लागुन असलेले देवतलाव मागील काही वर्षापासुन अनियमित पावसाअभावी सातत्याने कोरडे पडत आहेत. सदर तलाव कोरडे पडल्यामुळे सन १९७२ नंतर म्हणजेच तब्बल ४६ वर्षानंतर वाशिम शहराची पाणी पातळी अत्यंत खोलात गेली आहे. भिषण पाणी टंचाईमुळे वाशिमसह परिसरातील नागरिक तसेच पशुपक्षी व सर्व प्राणी मात्रांची पाण्यांसाठी वनवन भटकंती सुुरु आहे. भविष्यात पाणी टंचाइृचा सामना करण्याची वेळ नवीन पिढीवर येवु नये म्हणुन शहरातील समाजसेवी युवकांनी ‘मी वाशिमकर’ या गु्रपची स्थापना करण्यात आली व देवतलावातील घाण तसेच गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. वाशिमकर ग्रुपचे परिश्रम व मेहनत पाहता शहरातील सर्व समाजातील नागरिक व जनता आपले भेदभाव विसरुन या ज्वलंत समस्येचे निराकरण करण्यासाठी तनमनधनाने पुढे सरसावले. शहरातील सर्व सामाजिक व स्वयंसेवी संस्था ,शासकीय व निमशासकीय संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवतलावात प्रत्यक्षरित्या मेहनत करुन देवतलावाचे गाळ उपसण्यासोबतच त्याचे खोलीकरण करण्यात यश मिळविले.या महत कार्याला सर्वसामाजिक संघटना ,समाजसेवी संस्था, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनासह इतर सर्वांनी परिश्रमासोबतच सढळ हाताने दानराशी देवुन आपला हातभार लावला आहे. या तलावाचे कार्य अंतीम टप्यात सुरु असुन देवतलाव पुर्नजीवनाचे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी वाशिमकर नागरिकांनी पुन्हा एकदा सढळ हाताने दानराशी देण्याची गरज आहे. वाशिमकरांच्या संयुक्त व एकत्रीकरणाने आगामी पावसाळ्यात देवतलाव तुडूंब भरुन पुढील शंभर वर्षात वाशिम नगरीत दुष्काळ परिस्थिती उदभवणार नाही यासाठी मी वाशिमकर ग्रुप अगदी तन्मयतेने परिश्रम घेत आहेत. देवतलावाचे सुरु असलेले कार्य पाहता वाशिमकर नागरिकांकडून या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक व कुतुहल व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिम