शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

वाशिम : १९ गावातील हजारो शेतकरी मंगळवारी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:26 IST

शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत. 

ठळक मुद्देपाणी वळविण्यास विरोध‘सोनल’ प्रकल्पाचे पाणी शेतक-यांनाच देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत. 

 सोनल प्रकल्पाचे पाणी इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली सुरु आहे. सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतक-यांना सिंचनासाठी राखीव राहील या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचा शासनाने निर्धार केला आहे. शेकडो शेतक-यांच्या जमिनी  संपादीत करुन आता प्रशासनाने सदर पाणी इतर ठिकाणी हलविण्याचा कंबर कसली आहे. या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठी झाला पाहिजे, इतरत्र वळवू नये याबाबत २४ रोजी सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने निर्णय घेतला आहे.  त्यानुसार मंगळवारी १९ गावातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दरम्यान, या संदर्भात झालेल्या या बैठकीला नारायण बारड, अनिल पाटील, दत्तात्रय भेराणे, विलास लांभाडे, पांडुरंग कोठाळे, किशोर देशमुख, राहुल वानखडे, गंगादीप राऊत, भिकाजी वैद्य, प्रमोद मदार्ने, सुभाष सुंठवाल, संदीप मुळे, सुरेंद्र राऊत, गणेश सुर्वे, विनोद वैद्य, जितेंद्र बारड, निलेश सुर्वे, विनोद सुर्वे, आतिष चौधरी, संतोष सावके, हर्षद सावके, रामा सुर्वे, मंगेश सुर्वे, दुर्गेश सुर्वे, राजेंद्र भगत, संतोष लांभाडे, चंद्रकांत ठाकरे, अजय  येवले, सुनिल येवले आदि उपस्थित होते. मंगळवारी हजारोच़्या संख्येने शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजक सोनल प्रकल्प सिंचन बचाव समितीने केले आहे. 

टॅग्स :washimवाशिम