शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वाशिम : १९ गावातील हजारो शेतकरी मंगळवारी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:26 IST

शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत. 

ठळक मुद्देपाणी वळविण्यास विरोध‘सोनल’ प्रकल्पाचे पाणी शेतक-यांनाच देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत. 

 सोनल प्रकल्पाचे पाणी इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली सुरु आहे. सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतक-यांना सिंचनासाठी राखीव राहील या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचा शासनाने निर्धार केला आहे. शेकडो शेतक-यांच्या जमिनी  संपादीत करुन आता प्रशासनाने सदर पाणी इतर ठिकाणी हलविण्याचा कंबर कसली आहे. या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठी झाला पाहिजे, इतरत्र वळवू नये याबाबत २४ रोजी सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने निर्णय घेतला आहे.  त्यानुसार मंगळवारी १९ गावातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दरम्यान, या संदर्भात झालेल्या या बैठकीला नारायण बारड, अनिल पाटील, दत्तात्रय भेराणे, विलास लांभाडे, पांडुरंग कोठाळे, किशोर देशमुख, राहुल वानखडे, गंगादीप राऊत, भिकाजी वैद्य, प्रमोद मदार्ने, सुभाष सुंठवाल, संदीप मुळे, सुरेंद्र राऊत, गणेश सुर्वे, विनोद वैद्य, जितेंद्र बारड, निलेश सुर्वे, विनोद सुर्वे, आतिष चौधरी, संतोष सावके, हर्षद सावके, रामा सुर्वे, मंगेश सुर्वे, दुर्गेश सुर्वे, राजेंद्र भगत, संतोष लांभाडे, चंद्रकांत ठाकरे, अजय  येवले, सुनिल येवले आदि उपस्थित होते. मंगळवारी हजारोच़्या संख्येने शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजक सोनल प्रकल्प सिंचन बचाव समितीने केले आहे. 

टॅग्स :washimवाशिम