शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : नव्या तुरीला हमीपेक्षा ७00 रुपये कमी भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:56 IST

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. 

ठळक मुद्देशेतकरी अडचणीतबाजारात नव्या तुरीची आवक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा ५0 हजार हेक्टरहून अधिक  क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. अपुरा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन या पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. अनेक शेतकर्‍यांना, तर तुरीचा खर्चही वसूल होणे कठीण झाल्याचे दिसत आहे. आता काही शेतकर्‍यांनी तुरीची काढणी करून ती बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे. आवक कमी असली तरी, व्यापारी वर्गाकडून तुरीची अतिशय कमी दरात खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षी शासनाकडून तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषित करण्यात आले होते, यंदा त्यामध्ये ५00 रुपयांची वाढ करून तुरीचे हमीभाव ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले; परंतु बाजारात मात्र शेतकर्‍यांची नवी तूर ६00 रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांकडील सोयाबीन संपल्यानंतर मात्र या शेतमालाच्या भावात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांकडून २७00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत असलेले सोयाबीन आता ३ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी केले जात आहे. अर्थात बाजार व्यवस्थेतील भाव पाडण्याच्या दृष्टचक्रामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात शासनानेच हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदीची सक्ती करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा शेतकर्‍यांकडील तूर शेवटच्या दाण्यापर्यंत हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी करून त्यांची लुबाडणूक कायमच राहणार आहे. 

शिल्लक असलेल्या जुन्या तुरीचे भाव गडगडले!नव्या तुरीचे भाव ओलाव्यामुळे कमी असल्याचे कारण बाजार व्यवस्थेकडून समोर करण्यात येत असले तरी, जुन्या तुरीला त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुरीचीही बाजारात बर्‍यापैकी आवक होत आहे; परंतु या तुरीला अद्यापही ४000 हजार ते ४२00 रुपये प्रति क्विंटल दरानेच खरेदी करण्यात येत आहे. भाववाढीसाठी वर्षभर प्रतिक्षा  करूनही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत असल्याचे यावरून दिसत आहे. या परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकर्‍यांची पिळवणूक थांबविण्यासाठी तातडीने नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.    

तुरीत ओलावा असल्यामुळे सध्या नव्या तुरीला ४५00 ते ४७५0 रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत; परंतु तुरीला मागणी असल्यामुळे या शेतमालाचे भाव अधिक वाढणार आहेत. सद्य:स्थितीत बाजारात या शेतमालाची आवकही नावापुरतीच होत आहे.- नीलेश भाकरेसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा लाड 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती