शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वाशिम : नव्या तुरीला हमीपेक्षा ७00 रुपये कमी भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:56 IST

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. 

ठळक मुद्देशेतकरी अडचणीतबाजारात नव्या तुरीची आवक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजारात मिळत असलेल्या नगण्यदराने शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत नव्या तुरीला बाजार समित्यांमध्ये ४५ ते ४७00 रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा ५0 हजार हेक्टरहून अधिक  क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. अपुरा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन या पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. अनेक शेतकर्‍यांना, तर तुरीचा खर्चही वसूल होणे कठीण झाल्याचे दिसत आहे. आता काही शेतकर्‍यांनी तुरीची काढणी करून ती बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे. आवक कमी असली तरी, व्यापारी वर्गाकडून तुरीची अतिशय कमी दरात खरेदी करण्यात येत आहे. गतवर्षी शासनाकडून तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषित करण्यात आले होते, यंदा त्यामध्ये ५00 रुपयांची वाढ करून तुरीचे हमीभाव ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले; परंतु बाजारात मात्र शेतकर्‍यांची नवी तूर ६00 रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांकडील सोयाबीन संपल्यानंतर मात्र या शेतमालाच्या भावात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांकडून २७00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत असलेले सोयाबीन आता ३ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी केले जात आहे. अर्थात बाजार व्यवस्थेतील भाव पाडण्याच्या दृष्टचक्रामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात शासनानेच हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदीची सक्ती करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा शेतकर्‍यांकडील तूर शेवटच्या दाण्यापर्यंत हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी करून त्यांची लुबाडणूक कायमच राहणार आहे. 

शिल्लक असलेल्या जुन्या तुरीचे भाव गडगडले!नव्या तुरीचे भाव ओलाव्यामुळे कमी असल्याचे कारण बाजार व्यवस्थेकडून समोर करण्यात येत असले तरी, जुन्या तुरीला त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुरीचीही बाजारात बर्‍यापैकी आवक होत आहे; परंतु या तुरीला अद्यापही ४000 हजार ते ४२00 रुपये प्रति क्विंटल दरानेच खरेदी करण्यात येत आहे. भाववाढीसाठी वर्षभर प्रतिक्षा  करूनही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत असल्याचे यावरून दिसत आहे. या परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकर्‍यांची पिळवणूक थांबविण्यासाठी तातडीने नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.    

तुरीत ओलावा असल्यामुळे सध्या नव्या तुरीला ४५00 ते ४७५0 रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत; परंतु तुरीला मागणी असल्यामुळे या शेतमालाचे भाव अधिक वाढणार आहेत. सद्य:स्थितीत बाजारात या शेतमालाची आवकही नावापुरतीच होत आहे.- नीलेश भाकरेसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा लाड 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती