शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाशिम : परजिल्ह्यातून आलेल्या ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:45 IST

२० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

वाशिम : परदेश, महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर संकलित केली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची सरकारी रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध असून, येथे ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया नागरिकांची तपासणी केली जाते. गत चार दिवसात १६०० जणांची तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

मालेगाव परजिल्ह्यातून मालेगाव तालुक्यात येणाºया नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसून येताच ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान तालुक्यातील २०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. मालेगाव शहरातील पुणे-मुंबई तसेच परदेशातून आलेल्यांपैकी केवळ पाच रुग्ण तपासणीसाठी आले आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मालेगाव नगरपंचायतने पुणे, मुंबईवरून आलेल्या कोणत्याच माणसांची नोंद ठेवली नाही तसेच त्यांना तपासणीकरिता तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात नेले नाही. मालेगाव शहरातील अनेक युवक-युवती शिक्षणासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या महानगरात गेले होते. तर काही नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई गेले होते. आता सर्व जण परत येत असून, तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील नागरिक आरोग्य तपासणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. केवळ पाच जणांनी आरोग्य तपासणी केली आहे.

मानोरामानोरा तालुक्यात १५ मार्च ते २३ मार्च या दरम्यान ३२६ जणांची आरोग्य तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. १५ मार्च रोजी पुणे व मुंबई येथून आलेल्या प्रत्येकी एक अशा दोन जणांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. १८ मार्च रोजी नाशिक येथून आलेले दोन नागरीक, १९ मार्च रोजी पुणे ३३ व मुंबई २३, २० मार्च रोजी पुणे २४, मुंबई २३, औरंगाबाद २, २१ मार्च रोजी पुणे ५९, मुंबई २४, नांदेड २ व अहमदनगर ९, २२ मार्च रोजी पुणे ४३, मुंबई १३, चंद्रपूर १, नागपूर २, जालना २, २३ मार्च रोजी पुणे ४६, मुंबई ९, वर्धा ३, कलकत्ता १, नागपूर ३ अशा एकूण ३२६ जणांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.कारंजा : कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात २१ मार्च रोजी ३२९, २२ मार्च रोजी ५८ आणि २३ मार्च रोजी २०६ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कारंजा येथून कामानिमित्त तसेच शैक्षणिक कारणांसाठी अनेकजण पुणे, मुंबई यासह महानगरामध्ये गेले आहेत. कोरोना विषाणूच्या संभाव्य संसर्गापासून बचावात्मक उपाय म्हणून परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. कारंजा तालुक्यात २१ ते २३ मार्च या दरम्यान ५९३ जणांची तपासणी करण्यात आली.

मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे २१ मार्च रोजी एकूण २०७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबई ४८, पुणे १२७, गुजरात ४, कोल्हापूर ११, अहमदनगर १०, दिल्ली १, श्रीनगर १, नागपूर ३, औरंगाबाद १, पठाणकोट १ यांचा समावेश आहे. २२ मार्च रोजी एकूण ३३ जणांची आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये अकोला ३, मुंबई १६, पुणे १२, मेहकर २ यांचा समावेश आहे. २३ मार्च रोजी एकूण ८८ जणांची आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये पुणे ४० आणि मुंबई येथून आलेल्या ४८ नागरिकांचा समावेश आहे.रिसोड : रिसोड तालुक्यात २१ मार्च रोजी १०, २२ मार्च रोजी ७३ आणि २३ मार्च रोजी १५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परजिल्ह्यातून रिसोड तालुक्यात येणाºया नागरिकांनी आरोग्य विभागाला माहिती देवुन तपासणी करुन घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस