शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वाशिम जिल्हय़ात यंदा पाणीटंचाईचे स्वरुप गतवर्षीपेक्षा सौम्य

By admin | Updated: May 14, 2014 22:35 IST

वाशिम जिल्हय़ात केवळ ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा

वाशिम : पाणी टंचाईला तोंड देण्याकरीता जिल्हा प्रशासन पाणीटंचाई कृती आराखडा बनवते. त्यानुसार पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठय़ासाठी टँकर लावले जातात. हा दरवर्षीचा अनुभव असला तरी २0१३ मधील अतवृष्टी व सततच्या पावसामुळे यंदा जिल्हय़ात आज तारखेपर्यंत केवळ तीन गावांमध्ये तीन विहिरींचे अधिग्रहण करुन तीन टँकर लावण्यात आले नाही. वाशिम जिल्हय़ात दरवर्षी पावसाळय़ात सरासरी ७९८ मि.मी. पाउस पडतो. जिल्हय़ात तीन मध्यम तर ९८ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या जलसाठय़ातून शेतीचे सिंचन केले जाते. २0१३ मध्ये जून ते ऑगस्ट या महिन्यात जिल्हय़ात सर्वच तालुक्यामध्ये वारंवार अतवृष्टी झाली.सतत पाउस पडला.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातही चांगलाच पाउस पडला. परिणामी, जिल्हय़ातील तीन मध्यम प्रकल्पासह ९८ पैकी ८५ लघु पाटबंधारे प्रकल्पात १00 टक्के जलसाठा झाला होता. अन्य प्रकल्पांमध्ये सुद्धा ५0 ते ९९ टक्केपर्यंत जलसाठा झाला होता.फेब्रुवारी मार्च महिन्यात जिल्हय़ात सर्वाधिक स्वरुपाचा वादळी पाउस व अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. एप्रिल व मे महिन्यात देखील जिल्हय़ात अनेक गावामध्ये वादळी पाउस पडला.त्यामुळे जिल्हय़ातील भूजलपातळी गत पाच वर्षाच्या सरासरीच्या तुललनेत सरासरी दोन ते तीन मीटरएवढी उंचावली आहे. मे महिन्यात मात्र, मानोरा तालुक्यात तीन गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्यामुळे विहीर अधिग्रहणासोबतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे आली. त्याची दखल घेउन जिल्हा प्रशासनाने १२ मे पासून मानोरा तालुक्यातील उज्जवलनगर, हिवरा खुर्द व पाळोदी या तीन गावांमध्ये विहिरीचे अधिग्रहण करुन तीन टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे.