शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत!

By admin | Updated: November 16, 2014 01:52 IST

खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर :शेतक-यांना किंचीत दिलासा.

वाशिम : यंदाच्या खरीप हंमागात सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाने काहीअंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खरीप हंगामाकरिता प्रशासनाने जाहीर केलेली सुधारित पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे जिल्हा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा सोयाबीनच्या पिकांवर मोठय़ा प्रमाणात रोगराईचा प्रकोप झाला होता. परिणामी, उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादन खर्च व प्रत्यक्ष उत्पादन यामधील तफावत वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकर्‍यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. शासकीय मदत जाहीर करण्यासाठी अथवा जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यासाठी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५0 पैश्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १३१ गावांची पैसेवारी ४४ पैसे इतकी आहे, तर मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. रिसोड तालुक्यातील १00 गावांची पैसेवारी ४६ पैसे असून, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ४६ पैसे इतकी आहे. कारंजा तालुक्यातील १६७ गावांची आकडेवारी ३७ पैसे तर मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.