शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत!

By admin | Updated: November 16, 2014 01:52 IST

खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर :शेतक-यांना किंचीत दिलासा.

वाशिम : यंदाच्या खरीप हंमागात सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाने काहीअंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खरीप हंगामाकरिता प्रशासनाने जाहीर केलेली सुधारित पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे जिल्हा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा सोयाबीनच्या पिकांवर मोठय़ा प्रमाणात रोगराईचा प्रकोप झाला होता. परिणामी, उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादन खर्च व प्रत्यक्ष उत्पादन यामधील तफावत वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकर्‍यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. शासकीय मदत जाहीर करण्यासाठी अथवा जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यासाठी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५0 पैश्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १३१ गावांची पैसेवारी ४४ पैसे इतकी आहे, तर मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. रिसोड तालुक्यातील १00 गावांची पैसेवारी ४६ पैसे असून, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ४६ पैसे इतकी आहे. कारंजा तालुक्यातील १६७ गावांची आकडेवारी ३७ पैसे तर मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.