शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

१५ दिवसांनंतर वाशिम जिल्ह्यात पाऊस!

By admin | Updated: September 1, 2016 02:02 IST

बळीराजा सुखावला; खरिपाच्या पिकांना मिळाले जीवदान.

वाशिम, दि. ३१ : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजतापासून जिल्हय़ातील अनेक भागात जोरदार पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला पाऊस आल्याने बळीराजा सुखावला आहे.जिल्हय़ात काही ठिकाणी ८ ते १0, तर काही ठिकाणी १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली होती, तर काही ठिकाणी पावसाअभावी पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली होती. अनेक भागात शे तकर्‍यांनी देवाकडे सुद्धा साकडे घातले. महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन केले. अखेर ३१ ऑगस्ट रोजी दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शे तकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले.जिल्ह्यात यंदा चार लाखांहून अधिक हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, तूर, मुग, उडीद, हळद आदी िपकांचा समावेश असून, सर्वाधिक पेरा पुन्हा एकदा सोयाबीनचाच आहे. यंदा पावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची पेरणी जुलै महिन्याच्या पूर्वार्धातच आटोपली. त्यानंतरच्या पावसामुळे पिकांची स्थिती जोमदार झाल्याने. पिकांप्रमाणेच शेतकर्‍यांचे चेहरेही हिरवेगार दिसू लागले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंंंत पीक परिस्थिती बरी होती. परंतु पावसाने गत १५ ते २0 दिवसांपासून दडी मारल्याने माळरानावरील पिके सुकू लागली होती. गत आठवड्यात तर चांगल्या दर्जाच्या जमिनीवरील पिकांनादेखील धोका पोहोचू लागला होता. गत तीन वर्षांंंपासून निसर्गाने साथ न दिल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन घेता आले नाही. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. बुधवारी दुपारनंतर पावसाने जिल्हाभरात सार्वत्रिक हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. मंगळवारी रात्रीदरम्यान जिल्ह्यात सरासरी ११.४0 मिमी पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे हातातून जाणार्‍या िपकांना जीवदान मिळाले. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, साखरा, कळंबा, तोंडगाव, तोरणाळा, अनसिंग, शेंदुरजना, नागठाणा, रिसोड, शिरपूर यासह ग्रामीण भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वच जण सुखावले आहेत.