शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:37 IST

पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील नागरिकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचे तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २३ मार्च रोजी सायंकाळी दिले. जिल्ह्याचा रहिवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई केली असून, पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.राज्यात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. तथापि, सावधगिरी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी मोडक यांनी २३ मार्च रोजी सीमा बंदीचा आदेश जारी केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेशात नमूद आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्ती, प्रवाशांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २३ मार्च २०२० पासून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची, पेट्रोलियम पदार्थ, दुध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे इत्यादींची वाहतूक वगळता जिल्ह्यात येणारी व जिल्ह्यातून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.सर्व सीमांची नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाºया कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले. सदर आदेश धडकताच सायंकाळी स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारातील गर्दी कमी केली.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस