शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

वाशिम जिल्हयातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागरिक अद्याप परजिल्ह्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:11 IST

वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नुक केंद्र्रशासनाच्या लॉकडाऊनसह राज्याच्या सीमाबंदी आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. संबंधित जिल्हाप्रशासनाकडून त्यांची सोय करण्यात आली असली तरी, ही सर्व मंडळी आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करीत आहेत.राज्यशासनाच्या सीमाबंदी आदेशानंतर सर्वच जिल्हाप्रशासनाने परजिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील लाखो लोक विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अशात सोयीसुविधा नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. ही मंडळी आपापल्या जिल्ह्यात परतण्यासाठी गैरमार्गाचा अललंब करीत आहे. त्यात मालवाहू वाहनांतून प्रवास करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहे. या प्रकारातून अपघातही घडले आहेत. शिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा लोकांना सुविधा पुरविण्यासाठी राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांना या लोकांची माहिती संकलित करून त्यांच्या भोजन, निवासाची सोय करण्याचे आदेश दिले, तर सर्व जिल्हा प्रशासनाला त्यांच्या जिल्ह्यातील परजिल्ह्यात असलेल्या लोकांची माहितीही घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाप्रशासनाने घेतलेल्या माहितीत जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ लोक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परजिल्ह्यात अडकलेले वाशिम जिल्ह्यातील काही कामगार वाहनांची सोय नसल्याने शेकडो किलोमीटर अंतराचा प्रवास पायी करून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध मार्गावर दिसत आहे. अशा कामगारांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नवी नुंबई, पुण्यात सर्वाधिक लोकवाशिम जिल्हाप्रशासनाकडून परजिल्ह्यातच अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक १७४ कुटुंबातील ४७७ नागरिक पुणे येथे, तर ११७ कुटूंबातील १२५ नागरिक नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय मुंबई येथे ११ कुटुंबातील ७२, कोल्हापूर येथे ३ कुटुंबातील ६६, पालघर येथे १९ कुटुंबातील ५९, ठाणे येथे ७ कुटुंबातील ४२, वर्धा येथे ६ कुटुंबातील ४०, अहमदनगर येथे ७ कुटुंबातील २२, हिंगोली येथे २ कुटुंबातील १७ आणि रत्नागिरी येथे अडकलेल्या १ कुटुंबातील १३ लोकांचा यात प्रमुख समावेश आहेत.

आधार नसलेल्यांची निवाऱ्यात सोय परजिल्ह्यात अडकलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यशासनाने त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासह निवाºयाची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यात कुठलाही आधार नसलेले कामगार वा इतर लोकांना शासकीय ईमारतींत राहण्याची व्यवस्था सर्व संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली असून, याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आलेली आहे.

टॅग्स :washimवाशिम