शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागरिक अद्याप परजिल्ह्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:11 IST

वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नुक केंद्र्रशासनाच्या लॉकडाऊनसह राज्याच्या सीमाबंदी आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. संबंधित जिल्हाप्रशासनाकडून त्यांची सोय करण्यात आली असली तरी, ही सर्व मंडळी आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करीत आहेत.राज्यशासनाच्या सीमाबंदी आदेशानंतर सर्वच जिल्हाप्रशासनाने परजिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील लाखो लोक विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अशात सोयीसुविधा नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. ही मंडळी आपापल्या जिल्ह्यात परतण्यासाठी गैरमार्गाचा अललंब करीत आहे. त्यात मालवाहू वाहनांतून प्रवास करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहे. या प्रकारातून अपघातही घडले आहेत. शिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा लोकांना सुविधा पुरविण्यासाठी राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांना या लोकांची माहिती संकलित करून त्यांच्या भोजन, निवासाची सोय करण्याचे आदेश दिले, तर सर्व जिल्हा प्रशासनाला त्यांच्या जिल्ह्यातील परजिल्ह्यात असलेल्या लोकांची माहितीही घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाप्रशासनाने घेतलेल्या माहितीत जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ लोक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परजिल्ह्यात अडकलेले वाशिम जिल्ह्यातील काही कामगार वाहनांची सोय नसल्याने शेकडो किलोमीटर अंतराचा प्रवास पायी करून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध मार्गावर दिसत आहे. अशा कामगारांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नवी नुंबई, पुण्यात सर्वाधिक लोकवाशिम जिल्हाप्रशासनाकडून परजिल्ह्यातच अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक १७४ कुटुंबातील ४७७ नागरिक पुणे येथे, तर ११७ कुटूंबातील १२५ नागरिक नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय मुंबई येथे ११ कुटुंबातील ७२, कोल्हापूर येथे ३ कुटुंबातील ६६, पालघर येथे १९ कुटुंबातील ५९, ठाणे येथे ७ कुटुंबातील ४२, वर्धा येथे ६ कुटुंबातील ४०, अहमदनगर येथे ७ कुटुंबातील २२, हिंगोली येथे २ कुटुंबातील १७ आणि रत्नागिरी येथे अडकलेल्या १ कुटुंबातील १३ लोकांचा यात प्रमुख समावेश आहेत.

आधार नसलेल्यांची निवाऱ्यात सोय परजिल्ह्यात अडकलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यशासनाने त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासह निवाºयाची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यात कुठलाही आधार नसलेले कामगार वा इतर लोकांना शासकीय ईमारतींत राहण्याची व्यवस्था सर्व संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली असून, याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आलेली आहे.

टॅग्स :washimवाशिम