शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वाशिम जिल्हयातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागरिक अद्याप परजिल्ह्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:11 IST

वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नुक केंद्र्रशासनाच्या लॉकडाऊनसह राज्याच्या सीमाबंदी आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. संबंधित जिल्हाप्रशासनाकडून त्यांची सोय करण्यात आली असली तरी, ही सर्व मंडळी आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करीत आहेत.राज्यशासनाच्या सीमाबंदी आदेशानंतर सर्वच जिल्हाप्रशासनाने परजिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील लाखो लोक विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अशात सोयीसुविधा नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. ही मंडळी आपापल्या जिल्ह्यात परतण्यासाठी गैरमार्गाचा अललंब करीत आहे. त्यात मालवाहू वाहनांतून प्रवास करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहे. या प्रकारातून अपघातही घडले आहेत. शिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा लोकांना सुविधा पुरविण्यासाठी राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांना या लोकांची माहिती संकलित करून त्यांच्या भोजन, निवासाची सोय करण्याचे आदेश दिले, तर सर्व जिल्हा प्रशासनाला त्यांच्या जिल्ह्यातील परजिल्ह्यात असलेल्या लोकांची माहितीही घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाप्रशासनाने घेतलेल्या माहितीत जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ लोक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परजिल्ह्यात अडकलेले वाशिम जिल्ह्यातील काही कामगार वाहनांची सोय नसल्याने शेकडो किलोमीटर अंतराचा प्रवास पायी करून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध मार्गावर दिसत आहे. अशा कामगारांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नवी नुंबई, पुण्यात सर्वाधिक लोकवाशिम जिल्हाप्रशासनाकडून परजिल्ह्यातच अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक १७४ कुटुंबातील ४७७ नागरिक पुणे येथे, तर ११७ कुटूंबातील १२५ नागरिक नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय मुंबई येथे ११ कुटुंबातील ७२, कोल्हापूर येथे ३ कुटुंबातील ६६, पालघर येथे १९ कुटुंबातील ५९, ठाणे येथे ७ कुटुंबातील ४२, वर्धा येथे ६ कुटुंबातील ४०, अहमदनगर येथे ७ कुटुंबातील २२, हिंगोली येथे २ कुटुंबातील १७ आणि रत्नागिरी येथे अडकलेल्या १ कुटुंबातील १३ लोकांचा यात प्रमुख समावेश आहेत.

आधार नसलेल्यांची निवाऱ्यात सोय परजिल्ह्यात अडकलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यशासनाने त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासह निवाºयाची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यात कुठलाही आधार नसलेले कामगार वा इतर लोकांना शासकीय ईमारतींत राहण्याची व्यवस्था सर्व संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली असून, याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आलेली आहे.

टॅग्स :washimवाशिम