शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

वाशिम जिल्हयातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागरिक अद्याप परजिल्ह्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:11 IST

वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नुक केंद्र्रशासनाच्या लॉकडाऊनसह राज्याच्या सीमाबंदी आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. संबंधित जिल्हाप्रशासनाकडून त्यांची सोय करण्यात आली असली तरी, ही सर्व मंडळी आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करीत आहेत.राज्यशासनाच्या सीमाबंदी आदेशानंतर सर्वच जिल्हाप्रशासनाने परजिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यातील लाखो लोक विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अशात सोयीसुविधा नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. ही मंडळी आपापल्या जिल्ह्यात परतण्यासाठी गैरमार्गाचा अललंब करीत आहे. त्यात मालवाहू वाहनांतून प्रवास करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहे. या प्रकारातून अपघातही घडले आहेत. शिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा लोकांना सुविधा पुरविण्यासाठी राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांना या लोकांची माहिती संकलित करून त्यांच्या भोजन, निवासाची सोय करण्याचे आदेश दिले, तर सर्व जिल्हा प्रशासनाला त्यांच्या जिल्ह्यातील परजिल्ह्यात असलेल्या लोकांची माहितीही घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाप्रशासनाने घेतलेल्या माहितीत जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ लोक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, परजिल्ह्यात अडकलेले वाशिम जिल्ह्यातील काही कामगार वाहनांची सोय नसल्याने शेकडो किलोमीटर अंतराचा प्रवास पायी करून गाव गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध मार्गावर दिसत आहे. अशा कामगारांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नवी नुंबई, पुण्यात सर्वाधिक लोकवाशिम जिल्हाप्रशासनाकडून परजिल्ह्यातच अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक १७४ कुटुंबातील ४७७ नागरिक पुणे येथे, तर ११७ कुटूंबातील १२५ नागरिक नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय मुंबई येथे ११ कुटुंबातील ७२, कोल्हापूर येथे ३ कुटुंबातील ६६, पालघर येथे १९ कुटुंबातील ५९, ठाणे येथे ७ कुटुंबातील ४२, वर्धा येथे ६ कुटुंबातील ४०, अहमदनगर येथे ७ कुटुंबातील २२, हिंगोली येथे २ कुटुंबातील १७ आणि रत्नागिरी येथे अडकलेल्या १ कुटुंबातील १३ लोकांचा यात प्रमुख समावेश आहेत.

आधार नसलेल्यांची निवाऱ्यात सोय परजिल्ह्यात अडकलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यशासनाने त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासह निवाºयाची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यात कुठलाही आधार नसलेले कामगार वा इतर लोकांना शासकीय ईमारतींत राहण्याची व्यवस्था सर्व संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली असून, याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आलेली आहे.

टॅग्स :washimवाशिम