शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

वाशिम: पाण्याअभावी ९00 एकरावरील ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:36 IST

वाशिम: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) जिल्ह्यातील १८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल ९00 एकर शेतीक्षेत्रावर आगामी तीन वर्षाकरिता सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते; मात्र योजनेच्या दुसर्‍याच वर्षी सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने ‘सेंद्रिय शेती’चा हा प्रयोग वांध्यात सापडला असून, सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणार्‍या भाजीपाल्यालाही बाजारपेठेत अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाले आहे. 

ठळक मुद्देशेतकरी हवालदिलसिंचनासाठी मिळेना पाणी, शेतमालास अपेक्षित दर मिळणे दुरापास्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) जिल्ह्यातील १८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल ९00 एकर शेतीक्षेत्रावर आगामी तीन वर्षाकरिता सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते; मात्र योजनेच्या दुसर्‍याच वर्षी सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने ‘सेंद्रिय शेती’चा हा प्रयोग वांध्यात सापडला असून, सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणार्‍या भाजीपाल्यालाही बाजारपेठेत अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाले आहे. केंद्रशासनाच्या राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत २0१६-१७ च्या खरीप हंगामापासून वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५0 शेतकर्‍यांचे ३ याप्रमाणे १८ गट स्थापन करण्यात आले. गटनिहाय निवड करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना सेंद्रिय पद्धतीने अन्नधान्य, फळे, भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षणही देण्यात आले. या माध्यमातून तब्बल ९00 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती फुलायला लागली होती; मात्र रासायनिक पद्धतीने कसल्या जाणार्‍या शेतीच्या तुलनेत अगदीच भिन्न आणि वेळखाऊ प्रक्रिया असलेल्या सेंद्रिय शेतीला काही गावांमधील शेतकर्‍यांचा अपवाद वगळल्यास विविध स्वरूपातील अडचणींमुळे अद्याप अपेक्षित चालना मिळालेली नाही. अशातच यंदाच्या पावसाळ्यात घटलेल्या पर्जन्यमानामुळे ग्रामीण भागातील सिंचन प्रकल्प, हातपंप, कूपनलिका, विहिरींनी हिवाळ्यातच तळ गाठल्यामुळे सिंचनाचा प्रश्न भेडसावत असल्याने अभियानात सहभागी शेतकर्‍यांनी सेंद्रिय पद्धतीने मालाचे उत्पादन घेणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना सेंद्रिय खत कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय शेतातच निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक ‘आत्मा’च्या माध्यमातून देण्यात आले. त्याचा अपेक्षित फायदा होत शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले होते. चालूवर्षीच्या रब्बी हंगामातही काही शेतकर्‍यांनी सेंद्रिय पद्धतीने तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. सध्या मात्र पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत असल्याने सेंद्रिय शेती धोक्यात सापडली आहे. - डॉ. डी.एल. जाधवप्रकल्प संचालक, ‘आत्मा’ 

टॅग्स :washimवाशिम