शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

वाशिम: खरीप पीकविम्याचा १३२४४ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 10:56 IST

Washim News १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा काढणाऱ्या आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्यापोटी या शेतकऱ्यांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई मिळणार असून, त्यापैकी २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ८०९ कोटी रुपयांचा भरणा पीकविमा कंपनीकडे केला होता. यंदाच्या हंगामात विविध स्थानिक नैसर्गिक आपत्तीसह परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात सोयाबीनच्या नुकसानाचे प्रमाण अधिक होते. या नुकसानापोटी शेतकऱ्यांनी पीकविमा मिळण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफ लाईन पद्धतीने रितसर अर्ज केले. या अर्जानुसार पीकविमा कंपनीने सर्वेक्षण केले असता प्रत्यक्ष स्थानिक आपत्तीने ५ हजार ६६१ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे  नुकसानापोटी या शेतकऱ्यांना ९३.४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे, तर काढणी पश्चात परतीच्या पावसामुळे  ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले असून, या शेतकºयांना नुकसानपोटी ५ कोटी ९१  लाख८९ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. अर्थात दोन्ही प्रकारातील नुकसानापोटी एकूण १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५.३३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून, एकूण २२९१ शेतकºयांच्या खात्यात ९० लाख ४९ हजार रुपयांची रक्कमही जमा करण्यात आली आहे.  पीकविम्याचा लाभ मिळालेले शेतकरी प्रकार                     शेतकरी संख्या     रक्कमस्थानिक आपत्ती         ५६६१             ९३.४४ काढणी पश्चात           ७५८३            ५९१.८९ ------------------------------------- एकूण                    १३२४४              ६८५.३३ 

 ५ हजार शेतकरी वचिंत जिल्ह्यात स्थानिक आपत्ती आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी १८ हजारांहून अधिक शेतकºयांनी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने तक्रारी केल्या. तथापि, यात निकषात  न बसल्याने आणि तक्रारीस विलंब झाल्याने ५ हजारांहून अधिक शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळू शकला नाही.   खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी २ हजार २९१ शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही मंजूर झाली आहे. -शंकरराव तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा