शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: खरीप पीकविम्याचा १३२४४ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 10:56 IST

Washim News १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा काढणाऱ्या आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्यापोटी या शेतकऱ्यांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई मिळणार असून, त्यापैकी २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ८०९ कोटी रुपयांचा भरणा पीकविमा कंपनीकडे केला होता. यंदाच्या हंगामात विविध स्थानिक नैसर्गिक आपत्तीसह परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात सोयाबीनच्या नुकसानाचे प्रमाण अधिक होते. या नुकसानापोटी शेतकऱ्यांनी पीकविमा मिळण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफ लाईन पद्धतीने रितसर अर्ज केले. या अर्जानुसार पीकविमा कंपनीने सर्वेक्षण केले असता प्रत्यक्ष स्थानिक आपत्तीने ५ हजार ६६१ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे  नुकसानापोटी या शेतकऱ्यांना ९३.४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे, तर काढणी पश्चात परतीच्या पावसामुळे  ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले असून, या शेतकºयांना नुकसानपोटी ५ कोटी ९१  लाख८९ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. अर्थात दोन्ही प्रकारातील नुकसानापोटी एकूण १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५.३३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून, एकूण २२९१ शेतकºयांच्या खात्यात ९० लाख ४९ हजार रुपयांची रक्कमही जमा करण्यात आली आहे.  पीकविम्याचा लाभ मिळालेले शेतकरी प्रकार                     शेतकरी संख्या     रक्कमस्थानिक आपत्ती         ५६६१             ९३.४४ काढणी पश्चात           ७५८३            ५९१.८९ ------------------------------------- एकूण                    १३२४४              ६८५.३३ 

 ५ हजार शेतकरी वचिंत जिल्ह्यात स्थानिक आपत्ती आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी १८ हजारांहून अधिक शेतकºयांनी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने तक्रारी केल्या. तथापि, यात निकषात  न बसल्याने आणि तक्रारीस विलंब झाल्याने ५ हजारांहून अधिक शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळू शकला नाही.   खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी २ हजार २९१ शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही मंजूर झाली आहे. -शंकरराव तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा