शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:35 IST

  वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे

- नंदकिशोर नारे / संतोष वानखडे  वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील १९ लाख १४ हजार ७८५ मतदारांपैकी ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी (६१.०९ टक्के) मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये ५८.८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात झालेल्या ७ लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे.मतदानाबाबत प्रशासनाची प्रभावी जनजागृती व वाढलेले जवळपास सव्वा दोन लाख मतदारांमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे मतदारांमध्ये बोलल्या जात आहे. असे असले तरी राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी वेगळेच मत मांडून याचा फायदा आमच्या पक्षाला होणार असल्याचे सांगितले. प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व ईतर काही मान्यवरांनी याबाबत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदानाच्या वाढीव टक्केवारीचा फायदा होणार असल्याचे सांगितले. मतदानाची टक्केवारी का वाढली यासंदर्भात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या मान्यवरांशी चर्चा केली असता गत २० वर्षांपासून एकच एक व्यक्ती, विकास खुंटल्याने जनता परिवर्तनासाठी मतदानासाठी बाहेर निघाल्याचा सूर निघाला. तर भाजपा- शिवसेनेच्या मान्यवरांना विचारणा केली असता युवकांचे वाढलेले मतदान व मोदींचे युवा मनावर असलेले प्रेमामुळे मतदान टक्केवारीत वाढ झाल्याचे सांगितले. असे असले तरी, आता या वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडते, हे २३ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी उघड होणार आहे.

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले युवा मतदार होत. आणि युवा मतदारांवर मोदींचा मोठया प्रमाणात प्रभाव आहे हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. लहान लेकरापासून तर जेष्ठांपर्यंत मोदींचे नाव ठाऊक आहे. युवकांच्या गळयातील ताईत मोदी बनले आहेत. आणि युवा मतदारांनी केलेले मतदान व त्यामुळे वाढलेली टक्केवारी ही यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मलाच होईल यात दुमत नाही.-खा.भावना गवळी, शिवसेना

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली यात दुमत नाही. परंतु यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये ती घटलेली आहे. टक्केवारी वाढण्याचे कारण म्हणजे नवमतदार, यापेक्षा मतदारांना हवे असलेले परिवर्तन आहे. अनेक वर्षांपासून मतदारसंघामध्ये परिवर्तन नाही आणि हे हवे असेल तर मतदार मतदानासाठी बाहेर निघतात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे याचा नक्कीच फायदा काँग्रेसशिवाय कोणालाही होणार नाही.-माणिकराव ठाकरे, काँग्रेस

गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस उमेदवाराचे प्लॅनिंग आहे. आणि दुसरे कारण हे ही असू शकते या मतदारसंघात असलेला ‘काँक्रीट’ उमेदवार जनतेला नको असावा. याशिवाय दुसरे कोणतेच कारण असू शकत नाही. मतदारांना आत ‘चेंज’ हवे असल्याने ते घराबाहेर पडलेत आणि त्यांनी मोठया प्रमाणात मतदान करुन याची टक्केवारी वाढली. आणि याचा सर्वात जास्त फायदा हा काँग्रेसच्या उमेदवारालाच होवू शकतो असा माझा स्वत:च अंदाज आहे.-अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री, काँग्रेस

पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदारसंघामध्ये केवळ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली त्याचे महत्वाचे कारण म्हणजे वाढलेले पावणे दोन लाख युवा मतदार होत. पहिले मतदान असल्याने त्यांनी उत्साहात व आवर्जुन मतदान केले. यामुळे टक्केवारील वाढ झाली. युवा मतदान वाढल्याने याचा फायदा हा शिवसेना - भाजपाच्या उमेदवार भावना गवळी यांना होईल. कारण युवांच्या मनावर राज्य करणारे मोदी आहेत. हे युवांना सुध्दा माहित आहे.-आ.राजेंद्र पाटणी, भाजपा, जिल्हाध्यक्ष

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBhavna Gavliभावना गवळीManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे