शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पुरात वाहून जाताना गावकरी आले धावून; महिला बालंबाल बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 13:55 IST

Washim News : ही घटना रिसोड तालुक्यातील जयखेड-नेतन्स मार्गावरील पुलाजवळ घडली.

वाशिम : शुक्रवार, २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आहे. पुराचा जोर कमी असल्याचे पाहून शेतातून परतणाºया शेतकरी, शेतमजूरांनी नाला ओलांडून घरी जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुराचा जोर किंचितचा वाढल्याने एक महिला वाहून जाण्याच्या स्थितीत असताना, सहकारी गावकरी मदतीला धावले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या रस्त्यावरील पुलाजवळ शुक्रवारी घडली.पावसाळ्याच्या दिवसात नादुरूस्त पूल, रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ठिकाणी जमिन समांतर असलेल्या नदी, नाल्यावर पूलाची निर्मिती नाही. रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या रस्त्यावरील नाल्यावर पुल नाही. पुलाची निर्मिती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याचे गावकरी सांगतात. पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पूर आला तर शेतकरी, शेतमजूर व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. पूर ओसरल्यानंतर किंवा पूराचा जोर वाढविण्यापूर्वी काही जण जीव मुठीत घेऊन नाला ओलांडण्याचा प्रयत्न करतात. २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जायखेडा, नेतन्सा परिसरात दमदार पाऊस झाला. पुराचा जोर वाढविण्यापूर्वी शेतकरी, शेतमजूर हे एकमेकांच्या साहाय्याने नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना, पाण्याचा जोर वाढल्याने एका महिलेचा हात सुटला. यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मदतीसाठी याचना करणाºया महिलेच्या मदतीला तातडीने सहकारी धावले आणि पुढील अनर्थ टळला.आता तरी पुलाची निर्मिती करावी !जायखेडा-नेतन्सा या नाल्यावर पूल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या नाल्याची पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू, जायखेडा-जोगेश्वरी गट गामपंचायत सरपंच मंदाकिनी साहेबराव वाळूकर, मदन इंगोले, किसन इंगोले, पोलीस पाटील बंडू पाटील वाळूकर, दौलतराव वाळूकर, अशोकराव वाळूकर, दत्ता वाळूकर, भगवान पाटील वाळूकर, राजेश बाजड, विनोद बाजड, ज्ञानबा बाजड आदींनी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडfloodपूर