शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

VIDEO- धगधगत्या उन्हात वन्यप्राण्यांचीही त्रेधा; चारा, पाण्यासह निवाऱ्यासाठीही धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:48 IST

गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.

वाशिम- गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा फटका मानवाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही बसत असून, धगधगत्या उन्हात चारा, पाण्यासह विश्रांतीसाठी सावलीचा शोध घेण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करीत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

वाशिम जिल्ह्यात पूर्वीच्या काळात जंगलाचे प्रमाण मोठे होते; परंतु कालांतराने वाढत्या लोकसंख्येनुसार वाढत चाललेली लोकवस्ती आणि वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांनाही विश्रांतीसाठी योग्य असे वृक्ष मिळेनासे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिवाची काहिली होत असून, माणसाने स्वत:च्या सुरक्षेसाठी निवारे बांधताना वन्यजिवांचा मात्र मुळीच विचार केला नाही. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या जंगलतोडीचे दुष्परिणाम मानवाला सोसावे लागतच आहेत. झाडांची संख्या घटल्याने जंगलक्षेत्र कमी होऊन जमिनीची धूप वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले. त्याचा फटका मानवापेक्षा अधिक वन्यप्राण्यांना बसत आहे. जंगलात कळपाने फिरणारी काळविटे, हरणे, निलगायी यांना विश्रांतीसाठी भरपूर अशी सावलीच कुठे दिसत नाही. आधीच भुक आणि तहानेमुळे या प्राण्यांचा जीव व्याकूळ होत असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडे शोधत आहेत. त्यातच मानवाचा जंगलातील संचार वाढल्यामुळे भयग्रस्त झालेले हे वन्यप्राणी सैरभैर पळत असल्याचे चित्र दिसत आहे.