शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

VIDEO- धगधगत्या उन्हात वन्यप्राण्यांचीही त्रेधा; चारा, पाण्यासह निवाऱ्यासाठीही धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:48 IST

गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.

वाशिम- गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा फटका मानवाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही बसत असून, धगधगत्या उन्हात चारा, पाण्यासह विश्रांतीसाठी सावलीचा शोध घेण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करीत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

वाशिम जिल्ह्यात पूर्वीच्या काळात जंगलाचे प्रमाण मोठे होते; परंतु कालांतराने वाढत्या लोकसंख्येनुसार वाढत चाललेली लोकवस्ती आणि वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांनाही विश्रांतीसाठी योग्य असे वृक्ष मिळेनासे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिवाची काहिली होत असून, माणसाने स्वत:च्या सुरक्षेसाठी निवारे बांधताना वन्यजिवांचा मात्र मुळीच विचार केला नाही. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या जंगलतोडीचे दुष्परिणाम मानवाला सोसावे लागतच आहेत. झाडांची संख्या घटल्याने जंगलक्षेत्र कमी होऊन जमिनीची धूप वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले. त्याचा फटका मानवापेक्षा अधिक वन्यप्राण्यांना बसत आहे. जंगलात कळपाने फिरणारी काळविटे, हरणे, निलगायी यांना विश्रांतीसाठी भरपूर अशी सावलीच कुठे दिसत नाही. आधीच भुक आणि तहानेमुळे या प्राण्यांचा जीव व्याकूळ होत असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडे शोधत आहेत. त्यातच मानवाचा जंगलातील संचार वाढल्यामुळे भयग्रस्त झालेले हे वन्यप्राणी सैरभैर पळत असल्याचे चित्र दिसत आहे.