शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

VIDEO- धगधगत्या उन्हात वन्यप्राण्यांचीही त्रेधा; चारा, पाण्यासह निवाऱ्यासाठीही धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:48 IST

गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.

वाशिम- गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा फटका मानवाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही बसत असून, धगधगत्या उन्हात चारा, पाण्यासह विश्रांतीसाठी सावलीचा शोध घेण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करीत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

वाशिम जिल्ह्यात पूर्वीच्या काळात जंगलाचे प्रमाण मोठे होते; परंतु कालांतराने वाढत्या लोकसंख्येनुसार वाढत चाललेली लोकवस्ती आणि वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांनाही विश्रांतीसाठी योग्य असे वृक्ष मिळेनासे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिवाची काहिली होत असून, माणसाने स्वत:च्या सुरक्षेसाठी निवारे बांधताना वन्यजिवांचा मात्र मुळीच विचार केला नाही. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या जंगलतोडीचे दुष्परिणाम मानवाला सोसावे लागतच आहेत. झाडांची संख्या घटल्याने जंगलक्षेत्र कमी होऊन जमिनीची धूप वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले. त्याचा फटका मानवापेक्षा अधिक वन्यप्राण्यांना बसत आहे. जंगलात कळपाने फिरणारी काळविटे, हरणे, निलगायी यांना विश्रांतीसाठी भरपूर अशी सावलीच कुठे दिसत नाही. आधीच भुक आणि तहानेमुळे या प्राण्यांचा जीव व्याकूळ होत असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडे शोधत आहेत. त्यातच मानवाचा जंगलातील संचार वाढल्यामुळे भयग्रस्त झालेले हे वन्यप्राणी सैरभैर पळत असल्याचे चित्र दिसत आहे.