शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

VIDEO : वाशिममध्ये जीव धोक्यात घालून शेतकरी करतात सोयाबीनची वाळवणी

By admin | Updated: October 20, 2016 16:12 IST

ओले सोयाबीन सुकविण्यासाठी शेतक-यांकडे जागाच नसल्याने हे शेतकरी चक्क या महामार्गावर सोयाबीन पसरवून जीव धोक्यात घालत सोयाबीन वाळवतात.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २० - विविध नैसर्गिक अडचणीमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना पिके वाचविण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. याची प्रचिती नागपूर-औरंगाबाद महामार्गावर बुधवारी पाहायला मिळाली. ओले सोयाबीन सुकविण्यासाठी शेतक-यांकडे जागाच नसल्याने हे शेतकरी चक्क या महामार्गावर सोयाबीन पसरवून जीव धोक्यात घालत सोयाबीन सुकवित आहेत. 
 
या महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने थैमान घातले. शेतकºयांना त्यामुळे सोयाबीनची सोंगणी करणेही कठीण झाले. आता शेतकºयांनी सोयाबीन काढणीची धूम सुरू केली आहे; परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन हे अद्यापही ओलसर आहे. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षीत भाव मिळेणासे झाले आहेत. सोयाबीनला चांगले भाव मिळावेत म्हणून हे अर्धे ओले सोयाबीन सुकविण्यासाठी त्यांना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत.  नागपूर-औरंगाबाद महामार्गावर काही शेतकरी जीव धोक्यात घालून सोयाबीन सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात महामार्गावर सोयाबीन सुकविण्याचा प्रकार हा चुकीचाच आहे, महामार्गावर सतत वाहतूक सुरू असते. अशात रस्त्यावर पसरवून टाकलेल्या सोयाबीनमुळे महामार्गावर सतत सुरू असलेल्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. याच वाहतुक कोंडीमुळे एखादे वाहन घाईघाईने सोयाबीनवरून जाण्याचा प्र्रकार घडून येथे शेतकºयाचा जीवही धोक्यात येऊ शकतो, हेसुद्धा तेवढेच खरे; परंतु शेतकºयांकडे पुरेशी जागाच नसल्यामुळे हे शेतकरी नाईलाजास्तव मार्गावरच सोयाबीन पसरवून सुकवित आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर कारंजा शेलुबाजारदरम्यान हा प्रकार पाहायला मिळत आहे.