शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:20 IST

आता शासनाकडून प्राप्त ‘ग्रीन लिस्ट’ची (मंजूर यादी) पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. पडताळणीनंतर या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याची कार्यवाही होणार आहे. विविध कारणांमुळे विलंब होत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना विलंबामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीपूर्वी आणि त्यानंतर ३0 ऑक्टोबरपूर्वी बहुतांश शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचे नियोजन तांत्रिक अडचणींमुळे फसल्यानंतर, आता शासनाकडून प्राप्त ‘ग्रीन लिस्ट’ची (मंजूर यादी) पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. पडताळणीनंतर या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याची कार्यवाही होणार आहे. विविध कारणांमुळे विलंब होत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.नानाविध कारणांमुळे शेतकर्‍यांवर विपरित परिस्थिती ओढवल्याने सन २0१७ च्या जून  महिन्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरूस्त्या केल्यानंतर सदर यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनस्तरावरही या यादीला चाळणी लावण्यात आली. सुरुवातीला दिवाळीपूर्वी काही शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात दिवाळीच्या पूर्वदिवशी अर्थात १८ ऑक्टोबर २0१७ रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्‍यांनाच कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान केला होता. त्यानंतर ३0 ऑक्टोबरपूर्वी किमान ५0 हजार शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचे नियोजनही केले होते; मात्र तांत्रिक अडचणींमुळे सदर नियोजन ३0 ऑक्टोबरपूर्वी प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही. शासन स्तरावर चाळणी व पडताळणीच्या विविध टप्प्यातून गेल्यानंतर पहिल्या टप्प्यात पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्ह्याला प्राप्त झाली. तालुका व गावनिहाय तसेच बँकनिहाय या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी परत एकदा पडताळणी करण्याच्या वरिष्ठ स्तरावरून सूचना असल्याने,  ग्रीन लिस्टमधील अर्जांची पडताळणी केली जात आहे. वारंवार होणार्‍या या पडताळणीमुळे शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्‍यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी यापूर्वीच करण्यात आली. ग्रीन लिस्टमध्ये असलेल्या शेतकर्‍यांच्या कागदपत्रे व बँक खात्यांची पुन्हा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ‘ग्रीन लिस्ट’मध्ये नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांचा सर्वाधिक समावेश  असल्याची चर्चा आहे. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी