शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST

वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम ...

वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी चार दिवसांपूर्वी दिले. त्यानुसार, गावपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. ग्रामीण भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण, लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याने, काही ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास, ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्या मदतीने घरोघरी जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. या अनुषंगाने ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

०००

कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता, कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

- डॉ.अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.