शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

अडाण पात्रात टरबुज शेतीचा प्रयोग, नदीकाठावरच विक्री: बुरशी रोगामुळे यंदा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:15 IST

मानोरा तालुक्यातील कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या अडाण नदीच्या पात्रात परजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून टरबुजाची शेती करण्यात येत आहे.

इंझोरी: मानोरा तालुक्यातील कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या अडाण नदीच्या पात्रात परजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून टरबुजाची शेती करण्यात येत आहे. या प्रयोगामुळे त्यांना दरवर्षी भरघोस उत्पन्नही मिळते; परंतु यंदा मात्र टरबुजावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे त्यांच्या उत्पादनात घट येत असल्याचे दिसत आहे.मानोरा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात बुडीत क्षेत्रात परजिल्ह्यातील शेतकरी टरबूज आणि खरबुजाची शेती करतात. पाणथळीच्या आणि रेताड जागेत हे पीक चांगले येते. त्यामुळेच या शेतकºयांना गेल्या काही वर्षांत या प्रयोगातून भरघोस उत्पन्नही मिळाले. विशेष म्हणजे हे शेतकरी पिक लेल्या टरबुज आणि खरबुजांपैकी ३० टक्के माल हा अडाण नदीवर बांधण्यात आलेल्या पुलानजिकच बसून विकत असतात. त्यामुळे त्यांना अधिक फायदाही होतो. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतमजुरांनाही उन्हाळ्यांच्या दिवसात  तीन ते चार महिने रोजगारही उपलब्ध होतो. एकंदरीत हा प्रयोग शेतकरी आणि शेतमजुरांसाठी उपयुक्त ठरत आहे. यंदाही या ठिकाणी याच शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली आहे. सुरुवातीला या पिकातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळाले; परंतु आता या पिकांवर बुरशीचा रोग आल्याने फळांचा आकार लहान होत असून, वेलींना फ ळधारणाही कमी झाली आहे. त्यामुळे या शेतकºयांचे यंदा मात्र नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.